शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

रॉकेल वितरण धोरणावर पुनर्विचार करा !

By admin | Updated: June 19, 2014 01:06 IST

राज्य शासनातर्फे ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा कमी रॉकेल वितरित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रॉकेल वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्टाचे आदेश : शासनाला चार आठवड्यांचा वेळनागपूर : राज्य शासनातर्फे ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा कमी रॉकेल वितरित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रॉकेल वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रॉकेल वितरण धोरणावर येत्या चार आठवड्यांत पुनर्विचार करून माहिती सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. रॉकेल वितरण धोरणातील विसंगतीबाबत कवडू पुंड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. आज, बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष याचिकेवर सुनावणी झाली. सध्याच्या धोरणानुसार शहरी भागात चार लिटर, तर ग्रामीण भागात दोन लिटर प्रती व्यक्ती रॉकेल वितरित करण्यात येत आहे. तसेच, शहरातील कुटुंबाला एका महिन्यात २२ लिटर, तर ग्रामीण कुटुंबाला १८ लिटर जास्तीतजास्त रॉकेल भेटू शकते. शहरात जवळपास सर्वांकडे एलपीजी कनेक्शन असल्यामुळे रॉकेलचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो. ग्रामीण भागात स्वयंपाक करणे, लाईट नसल्यास दिवा लावणे, लाकडे पेटविणे इत्यादीसाठी रॉकेलचा उपयोग केला जातो. यामुळे त्यांची गरज शहरी नागरिकांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनातर्फे विसंगतीपूर्ण धोरण अमलात आणण्यात येत असल्यामुळे न्यायालयाने खंत व्यक्त केली. शासनाचे धोरण सत्य परिस्थितीला सुसंगत व तर्कशुद्ध असले पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.११ जून रोजीच्या न्यायालयीन निर्देशानुसार राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी व्यक्तिश: उपस्थित राहून प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. याचिकेतील मूळ तक्रार समजून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले नाही, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, तर शासनातर्फे प्रभारी सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)