शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून चाचण्यांना देणार वेग, दहा जिल्ह्यांत चाचण्यांचे सरासरी प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 13:19 IST

केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार, त्वरित कारवाई करत राज्यातील संसर्ग वाढीच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या १० जिल्ह्यांत कोरोना चाचण्यांचे प्रमाण गतिमान करण्यात येणार असल्याचे प्रदीप व्यास यांनी म्हटले.

मुंबई - सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून दहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्याच्या तुलनेत या दहा जिल्ह्यांत सरासरी चाचण्यांचे प्रमाण कमी आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून, आकडे घसरत आहेत. मात्र, पश्चिमात्य देशात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. शिवाय, केंद्रानेही याविषयी सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार, त्वरित कारवाई करत राज्यातील संसर्ग वाढीच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या १० जिल्ह्यांत कोरोना चाचण्यांचे प्रमाण गतिमान करण्यात येणार असल्याचे प्रदीप व्यास यांनी म्हटले.

 सध्या राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा २.६% आहे, मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत कोरोना चाचण्यांचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्यात पुणे, सातारा, सांगली, नाशिक, पालघर, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही चाचण्या वाढविण्याची गरज आहे.  या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर राज्याच्या सरासरी दरापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. याखेरीज आय सी एम आर चॅनेल देशांप्रमाणे कोरोना वैद्यकीय तपासणी अहवाल २४ तासांच्या आत रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचेही पडताळण्यात येत आहे.  

दर दहा लाखांमागे ४.३४ लाख कोरोना चाचण्याराज्याच्या आरोग्य विभागाने नुकतेच अकोला, बुलडाणा, धुळे, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांतील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये दर दहा लाखांमागे अडीच लाखांपेक्षा कमी कोरोना चाचण्या करण्यात येतात, तर राज्यात दर दहा लाखांमागे सरासरी ४.३४ लाख कोरोना चाचण्या करण्यात येतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस