शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

बाष्पजल प्रक्रियेला मान्यता

By admin | Updated: March 28, 2015 00:10 IST

हापूसला दिलासा : युरोपातील निर्यातीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी घातली होती. यावर्षी अटीशर्थी ठेवत निर्यातीवरील बंदी उठवली होती. निर्यातीसाठी उष्णजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली होती. मात्र, अद्याप संशोधन पूर्ण होऊ शकले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.आंबा हे भारतातील नगदी पीक असून राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस प्रजाती जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार, गुणवैशिष्ट्यांमुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही प्रजाती लोकप्रिय आहे. आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तवले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या प्रजातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु, यासंबंधी तातडीने अहवाल पाठवण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. परंतु, सध्या अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकऱ्यांनी बाजारपेठेत पाठवण्यास सुरूवात केली आहे. परंतु, उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्यास उशीर होणार असल्याने सध्या बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडे सत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याद्वारे हळुहळू तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. संबंधित प्रक्रिया वाशी येथे होत असल्यामुळे युरोपीय देशांनी त्यास मान्यता दिली आहे. वाशी मार्केटमधील ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर उष्णजलप्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात आला आहे.उष्णजलाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत बाष्पजल प्रक्रिया करूनच आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. २० ते २५ हजार पेट्या दिवसाला विक्रीला येऊ लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत आंबा निम्मा असला तरी दर मात्र घसरलेला दिसून येत आहेत. परदेशी आंबा निर्यात वाढली तर वाशी मार्केटमध्ये दर टिकतील, असा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत. (प्रतिनिधी)फळमाशीचे कारण देत घातली गेली होती आंबा निर्यातीवर बंदी. वाशी मार्केटमध्ये ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर प्रक्रिया. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू.तातडीने अहवाल पाठवणार.