शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

बाष्पजल प्रक्रियेला मान्यता

By admin | Updated: March 28, 2015 00:10 IST

हापूसला दिलासा : युरोपातील निर्यातीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी घातली होती. यावर्षी अटीशर्थी ठेवत निर्यातीवरील बंदी उठवली होती. निर्यातीसाठी उष्णजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली होती. मात्र, अद्याप संशोधन पूर्ण होऊ शकले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.आंबा हे भारतातील नगदी पीक असून राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस प्रजाती जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार, गुणवैशिष्ट्यांमुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही प्रजाती लोकप्रिय आहे. आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तवले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या प्रजातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु, यासंबंधी तातडीने अहवाल पाठवण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. परंतु, सध्या अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकऱ्यांनी बाजारपेठेत पाठवण्यास सुरूवात केली आहे. परंतु, उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्यास उशीर होणार असल्याने सध्या बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडे सत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याद्वारे हळुहळू तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. संबंधित प्रक्रिया वाशी येथे होत असल्यामुळे युरोपीय देशांनी त्यास मान्यता दिली आहे. वाशी मार्केटमधील ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर उष्णजलप्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात आला आहे.उष्णजलाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत बाष्पजल प्रक्रिया करूनच आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. २० ते २५ हजार पेट्या दिवसाला विक्रीला येऊ लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत आंबा निम्मा असला तरी दर मात्र घसरलेला दिसून येत आहेत. परदेशी आंबा निर्यात वाढली तर वाशी मार्केटमध्ये दर टिकतील, असा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत. (प्रतिनिधी)फळमाशीचे कारण देत घातली गेली होती आंबा निर्यातीवर बंदी. वाशी मार्केटमध्ये ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर प्रक्रिया. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू.तातडीने अहवाल पाठवणार.