शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

... म्हणून साईदर्शन इमारत कोसळली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 17:42 IST

घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

ठळक मुद्देसाईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे

मुंबई, दि. 25- घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनूसार,  साईदर्शन इमारतीमध्ये असलेल्या नर्सिंग होमने नुतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती, अनधिकृतपणे नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्यामुळे ही इमारत कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

विशेष म्हणजे ही इमारत 30 वर्ष जुनी होती. रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, अशीही प्राथमिक माहिती समोर येते आहे. इमारतीतील नियमबाह्य बदल तेथिल लोकांच्या जीवावर बेतल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. तर बीएमसीने कोणताही अहवाल दिला नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० ते 35 जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. या दुर्घटनेतील दोन जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, घटनेची माहिती कळताच अग्निशामकदलाचं पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांनी ही इमारत तीस ते चाळीसवर्ष जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला तसेच पालिकेकडून या इमारतीला नोटीस बजावण्यात आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दुर्घटनास्थळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असून, मदतकार्यामध्ये गुंतले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाडया, 108 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.  दरवर्षी पालिकेकडून पावसाळयात धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतही एक धोकादायक इमारत कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. दरवर्षी पावसाळयात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जुन्या जर्जर इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यात अनेक नागरीकांना प्राणास मुकावे लागते. इमारती रिकामी करण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावली जाते पण कोणतीही पर्याय व्यवस्था केली जात नसल्याने रहिवाशी आपला जीव मुठीत घालून त्या धोकादायक इमारतीमध्ये रहातात.