शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

... म्हणून साईदर्शन इमारत कोसळली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 17:42 IST

घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

ठळक मुद्देसाईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे

मुंबई, दि. 25- घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनूसार,  साईदर्शन इमारतीमध्ये असलेल्या नर्सिंग होमने नुतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती, अनधिकृतपणे नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्यामुळे ही इमारत कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

विशेष म्हणजे ही इमारत 30 वर्ष जुनी होती. रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, अशीही प्राथमिक माहिती समोर येते आहे. इमारतीतील नियमबाह्य बदल तेथिल लोकांच्या जीवावर बेतल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. तर बीएमसीने कोणताही अहवाल दिला नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० ते 35 जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. या दुर्घटनेतील दोन जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, घटनेची माहिती कळताच अग्निशामकदलाचं पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांनी ही इमारत तीस ते चाळीसवर्ष जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला तसेच पालिकेकडून या इमारतीला नोटीस बजावण्यात आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दुर्घटनास्थळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असून, मदतकार्यामध्ये गुंतले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाडया, 108 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.  दरवर्षी पालिकेकडून पावसाळयात धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतही एक धोकादायक इमारत कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. दरवर्षी पावसाळयात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जुन्या जर्जर इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यात अनेक नागरीकांना प्राणास मुकावे लागते. इमारती रिकामी करण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावली जाते पण कोणतीही पर्याय व्यवस्था केली जात नसल्याने रहिवाशी आपला जीव मुठीत घालून त्या धोकादायक इमारतीमध्ये रहातात.