शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'या' कारणामुळे दरवर्षी एका वारकरी जोडप्याला मिळतो विठ्ठलपूजेचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 13:56 IST

दरवर्षी मुख्यमंत्र्यांबरोबर एका वारकरी जोडप्यालाही विठ्ठलपूजेचा सन्मान मिळतो. दरवर्षी अशा एका जोडप्याचा फोटो आणि त्यांची माहिती प्रसिद्ध होत असते मात्र या सन्मानासाठी जोडप्याची निवड कशी होते हे तुम्हाला माहिती आहे का ?

मुंबई- दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात लाखो भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे. आषाढी एकादशीला पहाटे लवकर होणारी पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करण्याची प्रथा आहे. यंदा लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला न जाण्याच निर्णय घेतला आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांबरोबर एका वारकरी जोडप्यालाही विठ्ठलपूजेचा सन्मान मिळतो. दरवर्षी अशा एका जोडप्याचा फोटो आणि त्यांची माहिती प्रसिद्ध होत असते मात्र या सन्मानासाठी जोडप्याची निवड कशी होते हे तुम्हाला माहिती आहे का ?पंढरपुरात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आपल्या दिंड्यांमधून येत असतात. पंढरपूरच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यापासून आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी भक्तांची रांग सुरु होते आणि ती कित्येक किलोमीटर दूरपर्यंत जाते. इतके दिवस चालत पंढरपूरला आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा दिसून येत नाही. केवळ विठोबाचे दर्शन होणार या एकमेव इच्छेसाठी हे लोक दर्शनाची वाट पाहात असतात. या रांगेत पहिल्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या जोडप्याला मुख्यमंत्र्यांबरोबर विठोबाची पूजा करण्याचा सन्मान मिळतो. पूजेनंतर त्यांचा यथोचित सत्कारही केला जातो. त्यामुळेच दरवर्षी एका जोडप्याला हा सन्मान दिला जातो.चंद्रभागेतीरी जमला 10 लाख वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपुरात भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर वाळवंटात हरीनामाचा गजर करत वारकऱ्यांनी दर्शन रांगेकडे प्रस्थान केले आहे. आज विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

विठ्ठलभेटीच्या ओढीने गेल्या महिनाभरापासून उन,पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता विठ्ठलनामाचा जप करत पंढरीच्या दिशेने चालणारी पाऊले आज पंढरपूरात पोहोचली आहेत. तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा माऊलींच्या पालखींचेही पंढरपूरात आगमन झाले असून लाखो वारकऱ्यांची पाऊले चंद्रभागेतीरी विसावली आहेत. चंद्रभागा नदीला भरपूर पाणी असून निर्मळ आणि स्वच्छ चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविक नदीपात्रात उतरले आहेत. टाळ, मृदंगाच्या गजरात पंढरीत विठूरायाचा जप सुरु आहे. अवघी पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली असून चोहीकडे वारकरीच दिसत आहेत.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर