शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

खरंच, मोहन जोशींचं काय चुकलं?

By admin | Updated: December 14, 2014 02:34 IST

‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा राजकीय असून, तो त्याच व्यासपीठावर सोडविला पाहिजे. नाटय़ संमेलनाचे व्यासपीठ अशा कोणत्याही वादापासून दूर असले पाहिजे.

‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा राजकीय असून, तो त्याच व्यासपीठावर सोडविला पाहिजे. नाटय़ संमेलनाचे व्यासपीठ अशा कोणत्याही वादापासून दूर असले पाहिजे. जर राजकीय कार्यक्रमात नाटकांविषयी कोणी बोलणार नसेल, तर नाटय़ संमेलनात असे विषय कशाला हवेत?’ अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या या विधानाने उठलेला गदारोळ आणि ‘पडद्या’मागचे राजकारण..
 
नंदकिशोर पाटील - मुंबई
मुंबई-महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा विषय निघाला की,  मला आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकातील निपाणीचा तंबाखू व्यापारी लखोबा लोखंडे आठवतो, असं पु.ल. देशपांडे एकदा गमतीनं म्हणाले होते. आपणही आजवर या प्रश्नावर इतक्या वेळा इतक्या जणांकडून ठगवले गेलेले आहोत, की पुलंचा तो उपहासही आता खरा वाटू लागला आहे!
अभिजात कलांना राजाश्रय मिळवून देणं आणि त्या बदलात अशा कलांची व्यासपीठं आपलं ईप्सित साध्य करण्यासाठी वापरणं, हे असलं राजकारण आपल्याकडं पूर्वापार चालत आलं आहे. तेवढय़ाचसाठी राजकारणातील मंडळी नाटय़ आणि साहित्य संमेलनांचे मांडव उभारत असतात. बेळगाव येथे होऊ घातलेलं नाटय़ संमेलनदेखील  अशाच राजकीय पेचात सापडलं आहे.  पहिल्यांदाच बेळगावात नाटय़ संमेलन होत आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारनेही आर्थिक साह्य करण्याची तयारी दर्शविली आहे. अनेक वर्षानंतर सीमाभागातील मराठी भाषिकांना नाटय़ कलावंतांच्या भेटीचा योग जुळून आलेला आहे. असं सगळं नवतीचं वातावरण असताना यजमानांच्या घरी यथेच्छ पाहुणचार झोडून झाल्यावर त्यांच्याच तोंडावर निषेधाची सुपारी टाकत निरोप घ्यावा, असा आग्रह महाराष्ट्र एकीकरण समितीतील राजकीय ठेकेदारांनी धरला असेल, तर तो नाटय़ परिषदेला कसा मान्य होणार?  खरं म्हणजे मोहन जोशींनी केलेल्या विधानाबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला हवं. सीमाप्रश्न हा पूर्णत: राजकीय विषय आहे आणि तो तिथेच सोडविला गेला पाहिजे. साहित्य आणि नाटकाशी त्याचा काहीएक संबंध नाही, हे कोणीतरी एकदा ठणकावून सांगायलाच हवं होतं. पण आपल्याकडच्या उत्सवी  मंडळींना संमेलनाचा आणि त्यातील ठरावाचा भारी सोस. संमेलन कोणतेही असो, मांडव सोडण्यापूर्वी सीमाप्रश्नावर ठराव मांडला गेलाच पाहिजे. त्याशिवाय कर्तव्यपूर्ती नाही. आजवर जोपासलेली ही अंधश्रद्धा अभिजनांची पाठ सोडायला तयार नाही. मोहन जोशींनी त्यावरच घाव घातल्याने काहींच्या पिंडदानाचे पुण्य हिरावले गेले. सीमाप्रश्नाच्या नावाने राजकीय दुकान चालविणा:यांनी पराचा कावळा केला आणि जोशीबुवांना माफी मागणो भाग पडले. यानिमित्ताने 1929 साली बेळगावात भरलेल्या 14व्या मराठी साहित्य संमेलनाची आठवण झाली. शिवरामपंत परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले हे संमेलन उधळून लावण्याचा इशारा कर्नाटक एकीकरण समितीने दिला होता.  मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले, तर बेळगाववर मराठी भाषिकांचा दावा खरा मानला जाईल, अशी त्यांना शंका होती. शेवटी ‘आम्ही बेळगाववर हक्क सांगणार नाही,’ असा कबुलीनामा संयोजकांकडून लिहून घेतला गेला आणि संमेलन पार पडले. शिवरामपंतांनी आपल्या भाषणात मराठी आणि कानडी अशा दोन्ही बाजूच्या लोकांना चांगलेच फटकारले. ते म्हणाले, एखाद्या भाषेचा फाजील अभिमान न बाळगता हिमालयापासून कन्याकुमारीर्पयत पसरलेल्या अखंड भारतावर आपण प्रेम करावे. बेळगाव महाराष्ट्रात आहे, की कर्नाटकात, याच्याशी साहित्याचा काहीही संबंध असू शकत नाही. आज नेमकं उलट घडत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकच नियोजित नाटय़ संमेलनाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. कदाचित, संमेलनाच्या आयोजनापासून त्यांना चारहात लांब ठेवल्यामुळे त्यांनी संमेलन उधळण्यासाठी बेलभंडारा हाती घेतला असावा. नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांचे म्हणणोही असेच आहे. संमेलन न होऊ देण्याबाबत एकीकरण समिती आमच्यावर दबाव टाकत आहे, असा थेट आरोप करत नाटय़ संमेलनात सीमा प्रश्नावर ठराव मांडण्यात आग्रह धरणा:या समितीच्या कार्यकत्र्यानी बेळगाव महापालिका ताब्यात असताना तिथे का नाही आणला अजून ठराव, असा सवाल श्रीमती लोकूर यांनी केला आहे. दुसरे असे की, या संमेलनात सीमाप्रश्नावर ठराव मांडला गेला नाही, म्हणून बेळगाव महाराष्ट्राला मिळणारच नाही आणि समजा ठराव मांडला गेला तर ते लगेच मिळून जाईल, असेही काही नाही. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची पहिली हाक हैदराबाद येथे भरलेल्या साहित्य संमेलनात दिली गेली होती, याची आठवण कोणाला होईल. पण मराठवाडय़ातील साहित्यिक केवळ ठराव करून मोकळे झाले नाहीत, तर त्यांनी रजाकाराच्याविरोधात सशस्त्र संघर्ष केला. आज असे किती जण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतील. शंकाच आहे.
 
दोन राज्यांच्या सीमांचा वाद वैधानिक आणि राजकीय पातळीवर सोडविला गेला पाहिजे. ते न करता आपण या प्रश्नाचं पार लोणचं करून टाकलं आहे. जितकं मुरेल, तितकी चव अधिक! महाराष्ट्रात वीज मिळत नाही. मिळाली तर ती परवडत नाही म्हणून कर्नाटकात जाणा:या उद्योजकांना सीमावाद्यांपैकी कोणी जाब विचारल्याचे ऐकीवात नाही. सीमाभागातील ऊस तिकडच्या कारखान्यात जातो, त्यावरही कोणी गु:हाळ गाळत नाही. मग, नाटककार मंडळी तिकडं जाऊन आपले कलागुण दाखवणार असतील, तर त्यांच्या वार्षिक उरुसावर विरजण का? कोणी फारच आग्रह धरला, तर ते हवा तसा ठराव पास करतील. पण मग तेही कोणाला ‘नाटक’ वाटले तर काय? 
 
आजवर अनेक जणांनी घेतली ‘तो मी नव्हेच’ भूमिका
बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह कर्नाटकातील 835 गावांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, म्हणून 1956 पासून सुरू असलेला संघर्ष अद्याप सुरू आहे. आजवरच्या सर्व साहित्य आणि नाटय़ संमेलनांत त्यावर ठराव झाले. एवढेच कशाला महाराष्ट्र विधानसभेत देखील ठराव मंजूर झाला, पण प्रश्न सुटला नाही. मग ते सगळे ठराव गेले कुठे? मोहन जोशींना आरोपीच्या पिंज:यात उभे करण्यापूर्वी आजवर किती जणांनी ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेतली. त्यांचीही साक्ष काढली गेली तर लंबी फेरिस्त तयार होईल.