शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

५७ हजार विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले

By admin | Updated: August 26, 2015 01:44 IST

दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या

पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. एकूण निकाल २५.३७ टक्के लागला असून, ३५ हजार ३४६ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले, तर एकूण १ लाख ७ हजार २६ विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.उत्तीर्ण झालेल्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात आॅफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येईल. त्यासाठी नजीकच्या जागा रिक्त असलेल्या महाविद्यालयांत जाऊन प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. ३१ आॅगस्टला दुपारी ३ वा. गुणपत्रिकांचे वाटप होणार असून, ३१ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी २५ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येईल.५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांना फायदा !राज्यातील १ लाख ४० हजार १२१ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातून परीक्षा देणाऱ्या १ लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फेरपरीक्षेमुळे दुसरी संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४० हजार ३३४ विद्यार्थी केवळ एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत.दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार ३४६ इतकी आहे. त्यामुळे एकूण पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७ हजार २६ विद्यार्थी इतकी आहे.एकूण विद्यार्थ्यांमधील ४९ हजार ५०९ विद्यार्थी मार्च २०१५ साली झालेल्या परीक्षेत एटीकेटीनुसार अकरावीसाठी पात्र झाले होते. परिणामी जुन्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या वगळली असता एकूण ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांना नव्या नियमाचा फायदा झाला आहे.‘लोकमत’लाही श्रेयकर्नाटकात दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तातडीने फेरपरीक्षा होते, हे ‘लोकमत’ने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून देत त्याचा पाठपुरावाही केला होता. त्यावर तावडे यांनी १५ दिवसांत फेरपरीक्षेचा निर्णय जाहीर केला होता.मार्चमध्येच परीक्षाविद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने आॅक्टोबर महिन्याऐवजी जुलै-आॅगस्ट महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा आॅक्टोबर महिन्यात परीक्षा घेतली जाणार नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना मार्च २०१६मध्ये होणारी दहावीची परीक्षा द्यावी लागणार आहे.विभागनिहाय निकाल मंडळनोंदविलेलेउत्तीर्णटक्केवारीमुंबई३२,७३२५,८००१७.८४पुणे१९,०१५४,९४०२६.२०नागपूर१६९४१५२६६३१.२०औरंगाबाद१७०३५४६८८२७.६५कोल्हापूर९४९३२०६३२१.८०अमरावती१७६८८५७८०३२.८०नाशिक१२८३८३२४७२५.४९लातूर१३००४३३९३२६.२०कोकण१३७५१६९१२.५३ज्या जिल्ह्यांत अकरावीच्या जागा कमी आहेत, तेथील जागा पाच टक्क्यांनी वाढविण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत समुपदेशन करण्यात येईल. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री