शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा निवडणूक ? काठावर पास झालेल्या आमदारांचे वाढले टेन्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:58 IST

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. 

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे दोन किंवा तीन पक्षांना सोबत येऊनच सरकार स्थापन करावे लागलणार आहे. मात्र सर्वात मोठे पक्ष ठरलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेले चर्चा फोल ठरत आहे. तर विरोधकांनी ठेवलेल्या अटी मान्य न झाल्यास राज्यात पुन्हा निवडणुकीचा धडका उडू शकतो. या संदर्भात मंत्र्यानेच संकेत दिले आहे. त्यामुळे काठावर पास झालेल्या आमदारांचे टेन्शन वाढले आहे.

पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून तयारीला लागण्याचे आदेश भाजपमंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो. राज्यातील अनेक मतदार संघात बंडखोर आणि अपक्षांमुळे चुरशीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमदेवारांमध्ये केवळ 2 किंवा 5 हजार मतांचा फरक आहे. अशा स्थितीत निवडणूक पुन्हा लागल्यास, मतदान कमी होऊन पराभव होऊ शकतो, अशी भिती विजयी आमदारांमध्ये आहे. तर पराभूत उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित होत आहेत. 

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. 

दरम्यान शिवसेना-भाजप यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदावरून अडली आहे. त्यात भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. अशा स्थितीत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेसकडून देखील पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेना तयार न झाल्यास, राज्यात मध्यवधी निवडणूक होऊ शकते. परंतु, आर्थिक स्थिती आणि निवडणुकीचा भार यामुळे विद्यमान आमदारांचे 'इंडिकेटर' लागले आहेत.