शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पुन्हा निवडणूक ? काठावर पास झालेल्या आमदारांचे वाढले टेन्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:58 IST

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. 

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे दोन किंवा तीन पक्षांना सोबत येऊनच सरकार स्थापन करावे लागलणार आहे. मात्र सर्वात मोठे पक्ष ठरलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेले चर्चा फोल ठरत आहे. तर विरोधकांनी ठेवलेल्या अटी मान्य न झाल्यास राज्यात पुन्हा निवडणुकीचा धडका उडू शकतो. या संदर्भात मंत्र्यानेच संकेत दिले आहे. त्यामुळे काठावर पास झालेल्या आमदारांचे टेन्शन वाढले आहे.

पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून तयारीला लागण्याचे आदेश भाजपमंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो. राज्यातील अनेक मतदार संघात बंडखोर आणि अपक्षांमुळे चुरशीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमदेवारांमध्ये केवळ 2 किंवा 5 हजार मतांचा फरक आहे. अशा स्थितीत निवडणूक पुन्हा लागल्यास, मतदान कमी होऊन पराभव होऊ शकतो, अशी भिती विजयी आमदारांमध्ये आहे. तर पराभूत उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित होत आहेत. 

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. 

दरम्यान शिवसेना-भाजप यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदावरून अडली आहे. त्यात भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. अशा स्थितीत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेसकडून देखील पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेना तयार न झाल्यास, राज्यात मध्यवधी निवडणूक होऊ शकते. परंतु, आर्थिक स्थिती आणि निवडणुकीचा भार यामुळे विद्यमान आमदारांचे 'इंडिकेटर' लागले आहेत.