शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा रावसाहेब दानवेंकडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 12:28 IST

भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मुंबई - राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षांचा शोध घेण्यात येत आहे. त्यात आता पुन्हा एकदा खासदार आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव शर्यतीत आले आहे. त्यामुळे जालन्याला पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपने अनेक निवडणुकांत यश मिळवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने अनेक जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवला होता. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रदेशाध्यक्षपद तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले होते. तर दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीयमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकीत 2014 पेक्षा कमी जागा आल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यातच महाविकास आघाडीचे वाढते वर्चस्व पाहता भाजपला आक्रमक प्रदेशाध्यक्षांची गरज आहे. 

भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.