शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा रावसाहेब दानवेंकडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 12:28 IST

भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मुंबई - राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षांचा शोध घेण्यात येत आहे. त्यात आता पुन्हा एकदा खासदार आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव शर्यतीत आले आहे. त्यामुळे जालन्याला पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपने अनेक निवडणुकांत यश मिळवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने अनेक जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवला होता. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रदेशाध्यक्षपद तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले होते. तर दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीयमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकीत 2014 पेक्षा कमी जागा आल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यातच महाविकास आघाडीचे वाढते वर्चस्व पाहता भाजपला आक्रमक प्रदेशाध्यक्षांची गरज आहे. 

भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.