शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा रावसाहेब दानवेंकडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 12:28 IST

भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मुंबई - राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षांचा शोध घेण्यात येत आहे. त्यात आता पुन्हा एकदा खासदार आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव शर्यतीत आले आहे. त्यामुळे जालन्याला पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपने अनेक निवडणुकांत यश मिळवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने अनेक जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवला होता. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रदेशाध्यक्षपद तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले होते. तर दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीयमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकीत 2014 पेक्षा कमी जागा आल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यातच महाविकास आघाडीचे वाढते वर्चस्व पाहता भाजपला आक्रमक प्रदेशाध्यक्षांची गरज आहे. 

भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.