शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

रत्नागिरीत मेरीटाईमचे उपकेंद्र होणार

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

येथील बंदरांचा विकास तर होईलच, शिवाय येथील विद्यार्थ्याना संबंधित अभ्यासक्रमांसाठी परराज्यात जावे लागणार नाही.

रत्नागिरी : भारतीय मेरीटाईम बोर्डाने रत्नागिरीमध्ये उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या ठिकाणी नौदल प्रमाणपत्र व प्रशिक्षण देणारे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील बंदरांचा विकास तर होईलच, शिवाय येथील विद्यार्थ्याना संबंधित अभ्यासक्रमांसाठी परराज्यात जावे लागणार नाही.केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी रत्नागिरीत कार्यक्रमासाठी आले असता, त्यांच्याकडे मेरीटाईम उपकेंद्र सुरू करण्याविषयी मागणी करण्यात आली होती. मागणीसंदर्भात नामदार गडकरी यांनी याबाबत लक्ष घालून संबंधित उपकेंद्र सुरू करण्यास दुजोरा दिला आहे. उपकेंद्राला लागणारी जागा पाहण्यात आली आहे. मेरीटाईम विद्यापिठाचे संचालक जे. के.धर यांनी रत्नागिरीला भेट देऊन जागेची पाहणी केली आहे. समुद्र किनाऱ्यालगत सुमारे १५ एकर जागेची आवश्यकता असल्याने जयगड, व पावस रोड, व रत्नागिरीतील काही जागांची पाहणी करण्यात आली आहे.समुद्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या तरूणांना उपयुक्त असे २ ते ३ वर्षाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या मंडळींना आवश्यक असणारे अभ्यासक्रम वा प्रशिक्षण देणारे याठिकाणी छोटे मोठे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले, तर येथील मंडळींना गोवा किंवा केरळ सारख्या राज्यात जाऊन प्रशिक्षण किंवा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार नाही.जिल्ह्यातील बंदरांचा विकास झाला किंवा सुससज्ज बंदरे उभारली गेली, तर सागरी मालवाहतूक सुरू होईल. रस्त्यांमुळे मालवाहतूकीस होणारा वाढता इंधन खर्च, वाहनांची झीज, शिवाय लागणारा वेळ त्याचप्रमाणे वेळेत न पोहोचल्यामुळे मालाचे होणारे नुकसान आदी बाबी विचारात घेता सागरी वाहतूक निश्चितच उपयुक्त व रास्त दरातील आहे. कोकणात अनेक नवीन कंपन्या येऊ घातल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सागरी वाहतूकीचा विकास होणे गरजेचे आहे. जयगड येथील जिंदल कंपनीमुळे कोकण रेल्वे ते जयगड रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. डिंगणी ते जयगड मार्ग जोडण्यासाठी ७७५ कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे जर कोल्हापूर जिल्हा कोकणास जोडण्याकरीता कोल्हापूर ते वैभववाडी मार्ग रेल्वेने जोडण्यात आला, तर निश्चितच त्याचा फायदा होईल. रेल्वेमुळे रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल. शिवाय सुरक्षित कमी खर्चाने वाहतूक शक्य होईल. पुढे हीच वाहतूक सागरी मार्गाला जोडल्यास त्याचा फायदा होईल. कार्गो वाहतुकीमुळे निर्यातदारांना फायदा होईल. बंदरांचा विकास झाला तरच कार्गो वाहतूक विकसित होणार आहे. सध्या बंदरांची ६ ते ७ मिलियन टन कार्गो वाहतूक क्षमता आहे. मात्र, भविष्यात ती ५० मिलियन्स टन पेक्षाही वाढू शकते. त्याला मेरीटाईम उपकेंद्राचा मोठा हातभार लागेल. जेणेकरून बंदरांशी संबंधित अभ्यासक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)