शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुक: राष्ट्रवादीच्या पाठींब्यासाठी पवारांची भेट घेणार: आमदार सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 11:21 IST

निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असेही आमदार सामंत म्हणाले.

रत्नागिरी: नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साळवी यांचा विजय नक्की आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने रत्नागिरीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी आपण दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी विनंती करणार आहे, अशी माहिती शिवसेना आमदार उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

साळवी यांचा अर्ज भरताना नगरपरिषद जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे विजय हा शिवसेनेचाच होणार याबाबत आम्हाला खात्री आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना बंड्या साळवी यांनी शहरात अनेक उपक्रम राबविले. ६३ कोटींच्या नळपाणी योजनेचे काम ही युद्धपातळीवर सुरु आहे. पावसामुळे रत्नागिरी शहरात जे रस्त्यांवर खड्डे पडले होते, त्याचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. जिल्हा नगरोत्थानमधून जो निधी मिळाला आहे, त्यातील कामेही सुरु झाली असल्याचे सामंत म्हणाले.

या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबरला जे काही मतदान रत्नागिरीत होईल, त्यापैकी ७० टक्के मते ही शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळयी यांना मिळतील. रत्नागिरी महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा दिल्यास त्याबाबत उमेदवार माघार घेईपर्यंत निर्णय होऊ शकेल. तसेच शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठींबा मिळावा म्हणून शरद पवारांची भेट घेणार असल्याचे सुद्धा आमदार सामंत म्हणाले. परंतु निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असेही आमदार सामंत म्हणाले.

दोन दिवसांपूर्वीच भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाला आहे. त्यांचा आरोप आहे की, रत्नागिरी शहरातील रस्त्यांचा, विकासाचा शिवसेनेने बट्ट्याबोळ करून टाकला आहे, याबाबत आपले काय मत आहे, असे विचारता सामंत म्हणाले, त्यांनी काय म्हटले, यापेक्षा मतदारांवर आमचा विश्वास आहे. राहुल पंडित यांनी व्यक्तीगत कारणाने त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ही निवडणूक लादल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचे सुद्धा सामंत म्हणाले.