शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
7
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
8
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
9
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
10
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
11
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
12
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
13
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
14
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
15
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
16
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
17
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
19
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
20
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुक: राष्ट्रवादीच्या पाठींब्यासाठी पवारांची भेट घेणार: आमदार सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 11:21 IST

निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असेही आमदार सामंत म्हणाले.

रत्नागिरी: नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साळवी यांचा विजय नक्की आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने रत्नागिरीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी आपण दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी विनंती करणार आहे, अशी माहिती शिवसेना आमदार उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

साळवी यांचा अर्ज भरताना नगरपरिषद जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे विजय हा शिवसेनेचाच होणार याबाबत आम्हाला खात्री आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना बंड्या साळवी यांनी शहरात अनेक उपक्रम राबविले. ६३ कोटींच्या नळपाणी योजनेचे काम ही युद्धपातळीवर सुरु आहे. पावसामुळे रत्नागिरी शहरात जे रस्त्यांवर खड्डे पडले होते, त्याचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. जिल्हा नगरोत्थानमधून जो निधी मिळाला आहे, त्यातील कामेही सुरु झाली असल्याचे सामंत म्हणाले.

या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबरला जे काही मतदान रत्नागिरीत होईल, त्यापैकी ७० टक्के मते ही शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळयी यांना मिळतील. रत्नागिरी महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा दिल्यास त्याबाबत उमेदवार माघार घेईपर्यंत निर्णय होऊ शकेल. तसेच शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठींबा मिळावा म्हणून शरद पवारांची भेट घेणार असल्याचे सुद्धा आमदार सामंत म्हणाले. परंतु निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असेही आमदार सामंत म्हणाले.

दोन दिवसांपूर्वीच भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाला आहे. त्यांचा आरोप आहे की, रत्नागिरी शहरातील रस्त्यांचा, विकासाचा शिवसेनेने बट्ट्याबोळ करून टाकला आहे, याबाबत आपले काय मत आहे, असे विचारता सामंत म्हणाले, त्यांनी काय म्हटले, यापेक्षा मतदारांवर आमचा विश्वास आहे. राहुल पंडित यांनी व्यक्तीगत कारणाने त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ही निवडणूक लादल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचे सुद्धा सामंत म्हणाले.