शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

शाहूवाडीतील रताळी गुजरातच्या बाजारात

By admin | Updated: October 26, 2016 21:09 IST

उत्पादनात वाढ : समाधानकारक दर मिळाल्यामुळे शेतकरी सुखावला

राजाराम कांबळे -- मलकापूरपैसा देणारे पीक म्हणून रताळी पीक घेण्याचा कल शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील वीस ते चाळीस गावांत वाढत आहे. रताळी काढणी गतिमान झाली आहे. चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. शाहूवाडीतील रताळी नवी मुंबई, गुजरात, पुणे, कऱ्हाड, आदी बाजारांत दाखल झाली आहेत. घाऊक बाजारात ३५ ते ४० रुपये किलोला दर मिळाला होता. दर समाधानकारक असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे रताळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची दीपावली चांगली होणार आहे. चालूवर्षी तालुक्यातून दहा हजार टन रताळी निर्यात झाली आहेत.शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागातील पेरीड, निळे, कडवे, भोसलेवाडी, अमेणी, तुरकवाडी, कोतोली, कांडवण, पणुंद्रे, शिंदेवाडी, माण, परळे, उचत, आंबार्डे, शिराळे, ओकोली, गोगवे, भैरेवाडी, सुपात्रे, सावे, कोपार्डे, शित्तूर, मलकापूर या परिसरातील शेतकरी हे रताळी व्यावसायिक पीक घेताना दिसतात. नवरात्रौत्सवात व ईदला रताळ्याला मोठी मागणी असते. कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, नगर, नाशिक, पुणे, वाशी, मुंबई, सुरत, बडोदा, गुजरात, आदी बाजारपेठेत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असल्याचे सुशांत तांदळे, सुभाष कोळेकर यांनी सांगितले.खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड मृग नक्षत्रात केली जाते. रेती मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने उत्पादनात वाढ झाली. मात्र, रताळी मोठी न होता मध्यम स्वरूपाची मिळाली. तीन महिन्यांचे नगदी पीक नवरात्रौत्सव, ईद व दीपावली सणात काढण्यात येते. ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो. कमी खर्चात जादा उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा हे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. उसाला टनाला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळतो. मात्र, तीन महिन्यांत टनाला १५ ते २0 हजार रुपये दर मिळतो.पाच ते सहा वर्षांपूर्वी दलाल अगर पेढ्यांमार्फत रताळी स्थानिक बाजारपेठेत पाठविली जात होती. आता शेतकरी स्वत: वाहनातून वाशी, मुंबई, पुणे, कऱ्हाड, कोकणच्या बाजारात रताळी विक्रीस नेण्याचे धाडस करीत असल्यामुळे त्याला जादा पैसे मिळत आहेत. उसापेक्षा रताळीला जादा दर मिळत असल्यामुळे रताळी हा प्रमुख व्यवसाय होण्याची शक्यता आहे. पेरीड गाव अग्रेसर मलकापूर बाजारपेठेजवळ असणाऱ्या पेरीड गावातील शेतकरी दरवर्षी रताळीचे मोठे पीक घेताना दिसतात. दरवर्षी दोन हजार टन रताळी उत्पादन घेतले जाते.शाहूवाडी तालुक्यात रताळी पिकावर प्रक्रिया होणारा कारखाना शासनाने काढल्यास रताळी पिकाला चांगला दर मिळून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. - मारुती जाधव, शेतकरी १००० हेक्टरवर रताळीचे उत्पादन१० हजार --टन तालुक्यातून रताळी निर्यात१ टन -१० ते २० हजार रुपयांचा दर