शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शाहूवाडीतील रताळी गुजरातच्या बाजारात

By admin | Updated: October 26, 2016 21:09 IST

उत्पादनात वाढ : समाधानकारक दर मिळाल्यामुळे शेतकरी सुखावला

राजाराम कांबळे -- मलकापूरपैसा देणारे पीक म्हणून रताळी पीक घेण्याचा कल शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील वीस ते चाळीस गावांत वाढत आहे. रताळी काढणी गतिमान झाली आहे. चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. शाहूवाडीतील रताळी नवी मुंबई, गुजरात, पुणे, कऱ्हाड, आदी बाजारांत दाखल झाली आहेत. घाऊक बाजारात ३५ ते ४० रुपये किलोला दर मिळाला होता. दर समाधानकारक असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे रताळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची दीपावली चांगली होणार आहे. चालूवर्षी तालुक्यातून दहा हजार टन रताळी निर्यात झाली आहेत.शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागातील पेरीड, निळे, कडवे, भोसलेवाडी, अमेणी, तुरकवाडी, कोतोली, कांडवण, पणुंद्रे, शिंदेवाडी, माण, परळे, उचत, आंबार्डे, शिराळे, ओकोली, गोगवे, भैरेवाडी, सुपात्रे, सावे, कोपार्डे, शित्तूर, मलकापूर या परिसरातील शेतकरी हे रताळी व्यावसायिक पीक घेताना दिसतात. नवरात्रौत्सवात व ईदला रताळ्याला मोठी मागणी असते. कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, नगर, नाशिक, पुणे, वाशी, मुंबई, सुरत, बडोदा, गुजरात, आदी बाजारपेठेत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असल्याचे सुशांत तांदळे, सुभाष कोळेकर यांनी सांगितले.खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड मृग नक्षत्रात केली जाते. रेती मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने उत्पादनात वाढ झाली. मात्र, रताळी मोठी न होता मध्यम स्वरूपाची मिळाली. तीन महिन्यांचे नगदी पीक नवरात्रौत्सव, ईद व दीपावली सणात काढण्यात येते. ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो. कमी खर्चात जादा उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा हे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. उसाला टनाला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळतो. मात्र, तीन महिन्यांत टनाला १५ ते २0 हजार रुपये दर मिळतो.पाच ते सहा वर्षांपूर्वी दलाल अगर पेढ्यांमार्फत रताळी स्थानिक बाजारपेठेत पाठविली जात होती. आता शेतकरी स्वत: वाहनातून वाशी, मुंबई, पुणे, कऱ्हाड, कोकणच्या बाजारात रताळी विक्रीस नेण्याचे धाडस करीत असल्यामुळे त्याला जादा पैसे मिळत आहेत. उसापेक्षा रताळीला जादा दर मिळत असल्यामुळे रताळी हा प्रमुख व्यवसाय होण्याची शक्यता आहे. पेरीड गाव अग्रेसर मलकापूर बाजारपेठेजवळ असणाऱ्या पेरीड गावातील शेतकरी दरवर्षी रताळीचे मोठे पीक घेताना दिसतात. दरवर्षी दोन हजार टन रताळी उत्पादन घेतले जाते.शाहूवाडी तालुक्यात रताळी पिकावर प्रक्रिया होणारा कारखाना शासनाने काढल्यास रताळी पिकाला चांगला दर मिळून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. - मारुती जाधव, शेतकरी १००० हेक्टरवर रताळीचे उत्पादन१० हजार --टन तालुक्यातून रताळी निर्यात१ टन -१० ते २० हजार रुपयांचा दर