शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

रेशन दुकानदारांचा मोर्चा, १ एप्रिलपासून संपावर, शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:50 IST

राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकांना शासकीय सेवेत सामावून त्यानुसार वेतन देण्याची मागणी करत रेशन दुकानदार संघटनेच्या महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी आझाद मैदानात हजारो रेशन दुकानदारांनी आंदोलन केले.

मुंबई : राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकांना शासकीय सेवेत सामावून त्यानुसार वेतन देण्याची मागणी करत रेशन दुकानदार संघटनेच्या महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी आझाद मैदानात हजारो रेशन दुकानदारांनी आंदोलन केले. या वेळी आक्रमक झालेल्या महासंघाने १ एप्रिलपासून अन्न महामंडळातून कोणत्याही प्रकारची धान्याची उचल आणि दुकानांतील वितरणही न करण्याचा इशारा दिल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुष्पराज देशमुख यांनी दिली.शासनाने दुकानदारांची जबाबदारी घेतली नाही, तर सरकारविरोधात १ लाख २० हजार दुकानदार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा सोमवारच्या आंदोलनावेळी महासंघाने दिला. तर, देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र शासन दुकानदारांच्या मागण्यांबाबत गंभीर दिसत नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेतल्यानंतरच कोणताही निर्णय जाहीर करण्याचे बापट यांनी आश्वासित केले. मात्र सरकार केवळ वेळकाढूूपणा करत आहे. त्यामुळे १ एप्रिलचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच. पुढच्या विधानसभा निवडणुकीत सर्व दुकानदार या सरकारविरोधात मतदान करून आपला रोष व्यक्त करतील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर म्हणाले की, धान्य विक्रीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर दुकानाचे अर्धे भाडेही वसूल होत नाही. याउलट जनावरे खाणारी मका विकण्याचा सल्ला सरकार देत आहे. मुळात मका दळण्यासाठी भरडावी लागते, हे तरी सरकारला माहिती आहे का, असा सवालही बाबर यांनी उपस्थित केला आहे. तसेच तामिळनाडूच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली.रेशन दुकानावर काम करणाºया दुकानदाराला आणि कामगारांनाही शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यानुसार वेतन देण्याचे आवाहन आझाद मैदानाती आंदोलनावेळी करण्यात आले.सरकारने पुन्हा बेरोजगार केले!२००२ साली सरकारने सुशिक्षित बेरोजगार म्हणून केरोसिन परवाना दिला. मात्र गेल्या दीड वर्षापासून केरोसिन बंदी केल्याने परवानाधारक पुन्हा बेरोजगार झाले आहेत. आज वयाची चाळीशी उलटल्यानंतर कोणती नोकरी किंवा धंदा करायचा, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे शासनाने केरोसिनला पर्याय आणलेल्या गॅसची एजन्सी केरोसिन परवानाधारकांना देण्याची मागणी केरोसिन परवानाधारकांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र