शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे होणार राज्यातील व्याघ्रगणना

By admin | Updated: May 2, 2015 01:02 IST

देशात आणि राज्यांत वाघांची संख्या किती? यासंदर्भात असलेला घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे.

गणेश वासनिक, अमरावतीदेशात आणि राज्यांत वाघांची संख्या किती? यासंदर्भात असलेला घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाघांची प्रगणना करण्यास मदत मिळत असल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बुद्धपौर्णिमेला व्याघ्रगणना केली जाणार आहे.व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, पाणवठ्यावरील अस्तित्व व वनविभागाने विहित केलेल्या पद्धतीने २०१० ते २०१४ या दरम्यान व्याघ्र गणनेला सुरुवात करण्यात आली. नवीन पद्धतीनुसार कॅमेरा ट्रॅपिंग, नवतंत्रज्ञान प्रणाली वापरून देशभरातील वाघांची अचूक आकडेवारी निदर्शनास आली आहे. कॅमेरा ट्रॅपिंगमुळे वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची गणना करणे सुकर झाले आहे. एका प्रकल्पातील वाघ दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेत गेला तर ते या प्रणालीने सिद्ध करता येते. या अद्ययावत प्रणालीमुळे डेहरादून वन्यजीव संस्थेला सात वर्षांनी वाघांची संख्या निश्चित करणे शक्य झाले आहे. वाघांच्या पट्ट्यावरून वाघांची संख्या सहज स्पष्ट होऊ लागली आहे. वनविभागाने हे नवे तंत्रज्ञान शस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. वाघांचे संरक्षण आणि शिकाऱ्यांवर नजर ठेवता येते. त्यामुळे वनविभागाने वनखंडानुसार महत्त्वाच्या जागी कॅमेरे बसविले आहेत. दर दोन ते तीन दिवसांनी तपासणी करून यात कैद झालेल्या वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे वनाधिकाऱ्यांना सुलभ झाले आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव बांध - नागझिरा या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांमध्ये या प्रणालीचा उपयोग होऊ लागला आहे.