शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाजपकडून काही मिळत नसेल राणेंनी आरपीआयमध्ये यावे, आठवलेंची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 13:29 IST

माजी मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून काही मिळत नसेल तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे.

पिंपरी :  माजी मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून काही मिळत नसेल तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे. अशी ऑफर देत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री व आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राणे यांना आरपीआयमध्ये आम्ही काही देऊ शकणार नाही, पण त्यांचा मराठा दलित ऐक्यासाठी उपयोग होईल. 2019 मध्ये भाजपाच्या काही जागा घटतील,पण 250 पेक्षा कमी होणार नाहीत. एन डी ए सत्तेत राहील, असे भाकीत त्यांनी केले.शिवसेना भाजपा स्वतंत्र लढल्यास दोघांचेही नुकसान होईल, शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यास आपण स्वतः पुढाकार घेणार आहे,तरुणांनी स्वयं रोजगाकडे वळावे, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. 

2019मध्ये होणाऱ्या निवडणूकीत भाजपाच्या जागा कमी होतील असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी आज एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणूकीत भाजपाच्या जागा कमी होतील पण 250 जागांच्या जोरावर भाजपा पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करतील.  भाजपच्या जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला यावेळी आठवलेंनी दिला. मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात आठवलेंना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, मी सत्तेत असलो तरी माझ्याकडे गृहखातं नाही.  मात्र यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे. 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarayan Raneनारायण राणे