शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

राणेंचे बंड शमले!

By admin | Updated: August 6, 2014 03:28 IST

बंडाचे निशाण फडकविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी अखेर माघार घेतली असून, राजीनामा मागे घेत काँग्रेस पक्षातच कायम राहण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला.

राजीनामा अखेर मागे : काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय
मुंबई : उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बंडाचे निशाण फडकविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी अखेर माघार घेतली असून, राजीनामा मागे घेत काँग्रेस पक्षातच कायम राहण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. प्रचार समितीच्या प्रमुखपदावर राणो यांचा समेट झाल्याचे समजते. 
पक्षश्रेष्ठींनी दिलेले मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन पाळले नाही, समर्थकांची झालेली गळचेपी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यशैली, अशी कारणो पुढे करत राणो यांनी 21 जुलै रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी व पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली, मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे राणो काँग्रेसमध्येच राहणार की, बंड करून बाहेर पडणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा होत होती.
राणो मंगळवारी सायंकाळी पत्र परिषदेत भूमिका जाहीर करणार होते. त्याआधीच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. शरद रणपिसे व कृपाशंकरसिंह त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर पोहोचले. एक तास बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर राणो यांनी आपण राजीनामा मागे घेत असून, पक्षातच राहणार असल्याचे जाहीर केले. विधानसभेत पक्षाला विजय मिळवून देण्यास उद्यापासून राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सन्मानजनक वागणूक दिली जाईल, अशी हमी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीला सामुदायिक नेतृत्वाद्वारे सामोरे जाऊ, असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे, असा दावाही केला.
 
प्रचार समितीचे प्रमुखपद
निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखपद उद्योगमंत्री राणो यांना देण्यात येणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी राणोंशी केलेल्या चर्चेत त्यांना तसे आश्वासन श्रेष्ठींच्या वतीने दिले असल्याचे समजते. 
 
तीन महिन्यांसाठी प्रदेशाध्यक्षपद!
तीन महिन्यांसाठी काँग्रेस श्रेष्ठींकडे प्रदेशाध्यक्षपद मागितले होते, गेल्या दोन आठवडय़ांत पक्ष प्रवेशासाठी काही राजकीय नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला होता, असेही राणो म्हणाले.
 
नारायण राणो यांच्या निर्णयाचे स्वागत करतो़ भविष्याच्या दृष्टीने राणो यांनी योग्य निर्णय घेतला आह़े त्यांना सन्मान देण्याबाबतचा योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील़  - पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री़