शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ramdas Kadam : "उद्धव ठाकरेंना मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही"; रामदास कदमांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:27 IST

Ramdas Kadam Slams Shivsena Uddhav Thackeray : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. याच दरम्यान आता रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत.शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. याच दरम्यान आता रामदास कदम (Ramdas kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच "उद्धव ठाकरेंना मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही" असा गंभीर आरोप केला आहे. 

रामदास कदम यांनी "उद्धव ठाकरेंना मराठा समाजाचे लोक जे मोठे होताहेत त्यांना मोठं होऊन द्यायचं नाही. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत अशी भूमिका उद्धव ठाकरेंची आहे की काय? असा प्रश्न मला पडला आहे" असं  म्हटलं आहे. तसेच "कोण गद्दार आहे? याचं आत्मपरिक्षण तुम्ही करून बघा, 51 आमदार का जातात, शेकडो लोक सोडून का जातात? याचा विचार करा. उद्वव ठाकरे आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती" असं म्हणत टोला लगावला आहे, 

"तीन, तीन वर्षे मला बोलून दिलं नाही, भाषणं करू दिली नाहीत. शिवसेनेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. माझ्या खात्याअंतर्गत घेण्यात आलेले निर्णय आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले" असा आरोप कदम यांनी केला आहे. तसेच "मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला" असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. हॉस्पिटलमध्ये असताना आमच्याविरोधात कटकारस्थान रचलं आहे. तुम्ही आम्हाला संपवत नाहीत तर कोकणातल्या शिवसेनेला संपवत आहात असं म्हणत रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. TV9 मराठी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"तुमच्या मनात हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं. यानंतर आता मनसेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुमच्या मनात हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?" असा खोचक सवाल मनसेने उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेसने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाले नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्हपणा का आहे? हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता?" असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे