शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

...अन् रामदास कदमांनी फडणवीसांना थेट 'काळजीवाहू मुख्यमंत्री' संबोधले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 19:24 IST

सुरवातीला कदम यांनी बैठकीचा विषय स्पष्ट करताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण बैठकीला उपस्थित राहत असल्याचे सांगितले.

मुंबई: अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यामध्ये शिवसेनेचे सहा मंत्रीही सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारपरिषदेमध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री संबोधल्याने नवी चर्चा रंगली आहे.

सुरवातीला कदम यांनी बैठकीचा विषय स्पष्ट करताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण बैठकीला उपस्थित राहत असल्याचे सांगितले. कारण शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. असे असताना शिवसेना अनुपस्थित राहिली असे व्हायला नको, असेही त्यांनी सांगत बैठकीतील वृत्तांत सांगितला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यामध्ये शिवसेनेचे मंत्रीही सहभागी झाल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या गुऱ्हाळावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची ही बैठक असल्याचे शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावर सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिला आहे, असे म्हटले. 10 हजार कोटींची मदत अत्यंत कमी आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आकड्यानुसार ही मदत 17 हजार कोटींच्या पलिकडे जाते. यामुळे तेवढी मदत करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केल्याचे कदम यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा यावरून शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा रंगला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून परस्परविरोधी विधाने केली जात आहेत. यातच सामनाच्या अग्रलेखात मुख्यमंत्र्यांसाठी मावळते असा शब्द प्रयोग करण्यात आला होता. यानंतर आज शिवसेनेच्या एका मंत्र्यानेच फडणवीसांना मावळते मुख्यमंत्री म्हटल्याने आता थेट फडणवीसांवरच टीकेचे बाण सोडण्यास सुरूवात झाली आहे. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना