शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केंद्रीय कृषी कायदा मागे घेतल्यास लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 12:42 IST

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने कृषी कायदे (Farm Laws) मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले, तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, असे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देरामदास आठवले अहमदनगर दौऱ्यावरशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे - रामदास आठवलेशेतकऱ्यांची मागणी अयोग्य - रामदास आठवले

अहमदनगर : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने कृषी कायदे (Farm Laws) मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यातच आता कृषी कायद्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. (ramdas athawale says if farm laws are withdrawn then constitution will be threatened)

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले, तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, असे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे. अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी अनेकविध विषयांवर संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

"केरळमध्ये CAA लागू होणार नाही"; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले स्पष्ट

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे

कृषी कायदे मागे घेतल्यास अन्य कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी वेगवेगळी आंदोलने उभी राहू शकतात. हे संविधान आणि लोकशाहीला घातक आहे, असे सांगत केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असा पुनरुच्चार रामदास आठवले यांनी केला. 

अदानी, अंबानींचे व्यवसाय वेगळे

भारतातील आघाडीचे उद्योजक असलेल्या अदानी आणि अंबानी यांचा संबंध कृषी कायद्यांशी जोडणे योग्य नाही. ते चुकीचे आहे. अदानी आणि अंबानी यांचे व्यवसाय वेगळे आहेत. कृषीमालावर ते अवलंबून नाहीत. या कायद्यामुळे ते कृषी मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येतील, असे नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 

"न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणे पश्चाताप करून घेण्यासारखे आहे"

शेतकऱ्यांची मागणी अयोग्य

आंदोलक शेतकऱ्यांची कृषी कायदेच मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी असून, ती पूर्णपणे अयोग्य आहे. हे कायदे मागे घेतले तर, उद्या दुसरे घटक अन्य कायदे मागे घेण्याची मागणी लावून धरतील आणि तसे झाल्यास लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान अडचणीत येईल. नवीन कृषी कायद्यांना काळे कायदे का म्हणतात, असा सवाल करत यात काळे काय आहे, ते दाखवून द्यावे, असे आव्हान रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना विरोधकांना दिले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनRamdas Athawaleरामदास आठवलेagricultureशेतीPoliticsराजकारण