शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या निर्णयाचा शरद पवारांनी स्वागत केले पाहिजे: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 11:47 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवारांसोबत शरद पवार यांनी सुद्धा उभा राहिले पाहिजे.

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर यावरून राजकीय प्रतिक्रिया येत असून, अजित पवारांच्या निर्णयाला शरद पवारांनी पाठींबा दिला पाहिजे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहे.

एएनआय न्यूज वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, काल झालेल्या घडामोडींविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला न्यायालयात जाण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. मात्र आम्हाला सुद्धा सरकार बनवण्याचे अधिकार होते. शिवसेना भाजपसोबत येईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचे ठरवल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे आठवले म्हणाले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले असून अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवारांसोबत शरद पवार यांनी सुद्धा उभा राहिले पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठींबा देऊन त्याचे स्वागत केले पाहिजे अशी माझी त्यांना विनंती असल्याचे आठवले म्हणाले आहे.

तसेच नवीन स्थापन झालेले सरकर कायम राहणार असल्याचा दावा सुद्धा आठवले यांनी यावेळी केला. तर येणाऱ्या 30 तारखेला आम्ही आपले बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी राहणार असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले.