शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

अजित पवारांच्या निर्णयाचा शरद पवारांनी स्वागत केले पाहिजे: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 11:47 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवारांसोबत शरद पवार यांनी सुद्धा उभा राहिले पाहिजे.

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर यावरून राजकीय प्रतिक्रिया येत असून, अजित पवारांच्या निर्णयाला शरद पवारांनी पाठींबा दिला पाहिजे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहे.

एएनआय न्यूज वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, काल झालेल्या घडामोडींविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला न्यायालयात जाण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. मात्र आम्हाला सुद्धा सरकार बनवण्याचे अधिकार होते. शिवसेना भाजपसोबत येईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचे ठरवल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे आठवले म्हणाले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले असून अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवारांसोबत शरद पवार यांनी सुद्धा उभा राहिले पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठींबा देऊन त्याचे स्वागत केले पाहिजे अशी माझी त्यांना विनंती असल्याचे आठवले म्हणाले आहे.

तसेच नवीन स्थापन झालेले सरकर कायम राहणार असल्याचा दावा सुद्धा आठवले यांनी यावेळी केला. तर येणाऱ्या 30 तारखेला आम्ही आपले बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी राहणार असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले.