शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: “२०२४ मध्ये भाजपला तब्बल ४०० जागा मिळतील”; रामदास आठवलेंचे मोठे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 23:19 IST

Ramdas Athawale: देशाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणाचा खमकेपणा पंतप्रधान मोदींकडे असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सातारा: देशातील राजकीय पक्षांचे लक्ष हळूहळू सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे (Lok Sabha Election 2024) वळू लागले आहे. अनेक पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच आता रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल ४०० जागा मिळतील, असा दावा आठवले यांनी केला आहे. 

साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलच्या उद्घाटनानिमित्त ते आलेले असताना पत्रकारांशी संवाद साधला. देशाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणाचा खमकेपणा मोदी यांच्याकडे आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४ झाली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप तब्बल ४०० जागा मिळवेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले. 

कोणत्याही पोटनिवडणुकीत भाजप मोठा पक्ष

कोल्हापूर विधानसभा निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकू. २०२४ च्या निवडणुका आणि कोणत्याही पोटनिवडणुका यामध्ये भाजपा हा मोठा पक्ष असल्याने आणि संघटनात्मक बांधणी मजबूत असल्याने ४०० हून अधिक जागा मिळू शकतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती आणि एकूणच राज्य कारभाराविषयी सर्वसामान्यच काय तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर आकर्षण आहे. त्यांचे नेतृत्व आणि कामाची पद्धत यामुळे केंद्र स्तरावर सर्वसामान्य नागरिकांच्या विकास योजना राबविल्या जात आहेत. देशाची आर्थिक स्थिती आणि जीडीपी याच्या मध्ये वाढ होत आहे. त्यांच्या कामाची पद्धतीने भाजप सर्वसामान्य जनतेच्या जवळ जात आहे. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी मध्ये समाविष्ट असणाऱ्या शिवसेना पक्षावरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. 

दरम्यान, मनसेला सोबत घेणे योग्य वाटत नाही. मनसेचे सध्या वादळ असले तरी त्यांना फारशी मते मिळतात असे नाही. आता हिंदुत्ववादाचा मुद्दा घेतला असला तरी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा वादळ हे भाषणांचा आहे, मतांचं नाही असा टोला आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण