शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 20:12 IST

Ramdas Athawale News: राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष राजकारणातून संपेल. देशातील आरक्षण कधी संपणार नाही. राहुल गांधी, काँग्रेस पक्षाला धोका असू शकतो, पण देशातील लोकशाहीला धोका नाही, असा टोला रामदास आठवलेंनी लगावला.

Ramdas Athawale News: राहुल गांधी आरक्षण संपवण्याची भाषा करत असतील, तर काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल. भाजपा सत्ते आल्यास आरक्षण संपवतील, संविधान बदलतील, लोकशाही धोक्यात आहे, अशी विधाने काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक करत होते. परंतु, आता राहुल गांधी आरक्षण संपवण्याचे विधान करत आहेत. परदेशात जाऊन भारताबाबत अशी विधाने करणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करत आहेत. आंदोलन करत आहेत. त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे. मात्र, सध्या आरक्षण संपवण्याची ही वेळ नव्हे. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल, असे राहुल गांधी यांनी अमेरिकेत म्हटले होते. यावरून भाजपाने राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत थेट पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली. 

राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्दच करून टाकावा

जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत, तोपर्यंत आरक्षणाला धक्का लागू शकत नाही. राहुल गांधी यांनी बालिशपणा सोडावा. राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची निंदा करणे योग्य नाही. लोकशाही धोक्यात नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला धोका असू शकतो, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला. तसेच भारतातील लोकशाही कधीही धोक्यात येऊ शकत नाही. राहुल गांधींनी विधाने केली म्हणून आरक्षण संपुष्टात येऊ शकत नाही आणि त्यांचे सरकारही येणार नाही. अशा प्रकारची वक्तव्ये करून राहुल गांधी यांनी स्वतःचीच प्रतिमा मलीन करून घेतली आहे. राहुल गांधींनी योग्य पद्धतीने आपल्या भूमिका मांडाव्यात. परदेशात जाऊन देशाची निंदा करणे योग्य नाही. राहुल गांधी परदेशात जाऊन सातत्याने अशी विधाने करणार असतील, तर माझी सूचना अशी असेल की, राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्दच करून टाकावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. 

दरम्यान, राहुल गांधी अशा प्रकारची विधाने बाहेर जाऊन करतात, हे शोभत नाही. राहुल गांधी यांचे विधान समर्थनीय नक्कीच नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष राजकारणातून संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी बाहेरच्या देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करु नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.  

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस