शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 20:12 IST

Ramdas Athawale News: राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष राजकारणातून संपेल. देशातील आरक्षण कधी संपणार नाही. राहुल गांधी, काँग्रेस पक्षाला धोका असू शकतो, पण देशातील लोकशाहीला धोका नाही, असा टोला रामदास आठवलेंनी लगावला.

Ramdas Athawale News: राहुल गांधी आरक्षण संपवण्याची भाषा करत असतील, तर काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल. भाजपा सत्ते आल्यास आरक्षण संपवतील, संविधान बदलतील, लोकशाही धोक्यात आहे, अशी विधाने काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक करत होते. परंतु, आता राहुल गांधी आरक्षण संपवण्याचे विधान करत आहेत. परदेशात जाऊन भारताबाबत अशी विधाने करणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करत आहेत. आंदोलन करत आहेत. त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे. मात्र, सध्या आरक्षण संपवण्याची ही वेळ नव्हे. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल, असे राहुल गांधी यांनी अमेरिकेत म्हटले होते. यावरून भाजपाने राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत थेट पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली. 

राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्दच करून टाकावा

जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत, तोपर्यंत आरक्षणाला धक्का लागू शकत नाही. राहुल गांधी यांनी बालिशपणा सोडावा. राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची निंदा करणे योग्य नाही. लोकशाही धोक्यात नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला धोका असू शकतो, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला. तसेच भारतातील लोकशाही कधीही धोक्यात येऊ शकत नाही. राहुल गांधींनी विधाने केली म्हणून आरक्षण संपुष्टात येऊ शकत नाही आणि त्यांचे सरकारही येणार नाही. अशा प्रकारची वक्तव्ये करून राहुल गांधी यांनी स्वतःचीच प्रतिमा मलीन करून घेतली आहे. राहुल गांधींनी योग्य पद्धतीने आपल्या भूमिका मांडाव्यात. परदेशात जाऊन देशाची निंदा करणे योग्य नाही. राहुल गांधी परदेशात जाऊन सातत्याने अशी विधाने करणार असतील, तर माझी सूचना अशी असेल की, राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्दच करून टाकावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. 

दरम्यान, राहुल गांधी अशा प्रकारची विधाने बाहेर जाऊन करतात, हे शोभत नाही. राहुल गांधी यांचे विधान समर्थनीय नक्कीच नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष राजकारणातून संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी बाहेरच्या देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करु नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.  

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस