शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 14:00 IST

shortage of remdesivir: केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देरामदास आठवले यांची ठाकरे सरकारवर टीकापंतप्रधान मोदी चांगले काम करतायत - आठवलेकेंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही - आठवले

मुंबई: दुसऱ्या लाटेत कोरोनाचा झालेला उद्रेक भीतीदायक आणि गंभीर होत चालला आहे. मागील सलग काही दिवस देशातील कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार गेली आहे. अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. (ramdas athawale criticised thackeray govt over shortage of remdesivir)

महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही. रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. 

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह

पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत

देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मृत्युंना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा खोटा आणि खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे. महराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये, अशी टीका आठवले यांनी केली.

कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये 

केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसिवरसह सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीही आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि केंद्र सरकारवर आरोप करू नयेत, असेही आठवले यांनी म्हटले आहे. 

“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

पंतप्रधान मोदी १८ तास काम करतायत

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक दौऱ्यावरून परतल्यानंतरही दिवसातील १८ ते १९ तास काम करत आहेत. केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध लढाईत कोणताही भेदभाव न करता लढत आहे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि काही जण या विषयाला राजकीय रंग देऊ पाहतात ते पाहून फार वाईट वाटते, असे केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण