शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

“RSSचा विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे”; रामदास आठवले ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 21:10 IST

Ramdas Athawale News: जातीनिहाय जनगणनेबाबत रामदास आठवले यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

Ramdas Athawale News ( Marathi News ): बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना करत आरक्षणात दुरुस्ती करून मर्यादा वाढवल्यानंतर जातीनिहाय जनगणनेवर देशभरात चर्चा सुरू झाली. अनेक राज्यातून जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी होऊ लागली. तसेच केंद्रीय स्तरावरही जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीनिहाय जनगणनेला विरोध असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, RSSचा विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, असे ठाम मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

कोणत्या जातीमध्ये किती टक्के लोकसंख्या आहे, हे कळणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे म्हणने आहे की ते ३५ टक्के आहेत. त्याप्रमाणे इतर समाजांच्या लोकांना विचारले तर ते वेगवेगळी आकडे देतात. अशी जर मोघम आकडेवारी घेतली तर ती कितीतरी कोटीच्या घरात जाते. तर नक्की कोणत्या जातीचे किती टक्के आहे हे कळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. या आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे, तेवढे आरक्षण त्या त्या जातीला द्यावे. समजा असा जर निर्णय झाला तर लोकसंख्येच्या आधारे आमची टक्केवारी १५ टक्के होती. त्याआधारे आम्हाला १५ टक्के आरक्षण मिळतेय. महाराष्ट्रात आमची १३ टक्के लोकसंख्या असल्याने १३ टक्के आरक्षण आम्हाला मिळत आहे. त्याच धर्तीवर इतर समाजाला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले. 

RSSचा विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीनिहाय जनगणनेला विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे, तेवढे आरक्षण त्या त्या जातीला द्यावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ओबीसी समाजाची नक्की आकडेवारी किती आहे हे जनगणना झाल्या शिवाय कळणार नाही. महाराष्ट्रात सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी मी केली होती.  मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून, समाजातील गोरगरिबांना आरक्षणाचा लाभ मिळाले पाहिजे. अशी आमची भूमिका आहे. खेड्यापाड्यांत आजही सर्वच मराठे श्रीमंत नाही, सर्वच मराठे जमीनदार नाही. सर्वच मराठे आमदार-खासदार , उद्योगपती आहे असे नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची आग्रही भूमिका आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, संसदेवरील हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेची मोठी चूक आहे.  सुरक्षा व्यवस्था चोख असणे फार गरजेचे होते. आंदोलन करताना हा दिवस निवडणे चुकूचे होते. यामध्ये लातूरचा तरुण असून त्यांची चौकशी सुरू आहे. नव्या संसद भवनातील गॅलरीची उंची कमी असल्याने त्यावरून तरुणांनी उड्या मारल्या. हा निंदनीय प्रकार असून या मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी मात्र विरोधक ती होऊ देत नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेreservationआरक्षण