शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

राम मंदिराचा मुद्दा जुनाच - रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 17:25 IST

नोटिफीकेशन

लातूर - जनतेला पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर विश्वास आहे. विकासामुळे जनतेला आणि पक्षालाही सध्या ‘अच्छे दिन’ आहेत. शिवसेनेने उपस्थित केलेला राम मंदिराचा मुद्दा जुना आहे. हा विषय निवडणुकीचा होऊ शकत नाही. परंतु, शिवसेनेचे हे धोरण असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.खा. दानवे म्हणाले, १९९२-९३ मध्ये भाजपाने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी शिवसेना आमच्यासोबत होती. आताही समविचारी पक्षासोबत युती करण्याची भाजपची तयारी आहे. राम मंदिर हा विषय हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्याकरिता सरकार योग्य भूमिका घेईल. परंतु, सध्या भाजपाचा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे राम मंदिराचा विषय निवडणुकीचा होऊ शकत नाही. शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित केल्याने आमची काहीच अडचण होणार नाही. त्यांचे स्वागतच आहे. पत्रपरिषदेला पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. विनायकराव पाटील, जिल्हाध्यक्ष नागनाथअण्णा निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गणेश हाके, माजी आ. गोविंद केंद्रे, रमेश कराड आदींची उपस्थिती होती. मराठा समाजाला घटनादत्त आरक्षण राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे आता या समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्यासाठी कसलीच अडचण येणार नाही. आयोगाने अहवाल दिल्याने आरक्षण आता घटनादत्त होईल. शिवाय, भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे, या पक्षाने मराठा समाजाला इतर आरक्षणाला धक्का न लावता १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव केला असल्याचे खा. दानवे म्हणाले.विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता संपलेली आहे. भाजप देशात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात आता भीतीचा गोळा उठला आहे. राज्य व केंद्र सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून ओबीसी व मराठा समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय, असा आरोपही दानवे यांनी केला. वन बूथ.. २५ यूथ राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात आणि २८८ विधानसभा मतदारसंघांत वन बूथ २५ यूथ अशी बांधणी करण्यात आली आहे. बूथ प्रमुखांसह ९२ हजार यूथची बांधणी केली आहे. त्यापैकी ८३ हजार यूथचे प्रशिक्षण झाले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी ४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपचा दौरा सुरू आहे. लातूरचा चौथ्या टप्प्यातील दौरा आज होत असून, त्यानंतर हिंगोली, परभणी जिल्ह्याचा होणार असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेlaturलातूर