शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

'...तर बाळासाहेबांनी आव्हाडांचे 'ते' वक्तव्य खपवून घेतले नसते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 11:10 IST

आव्हाडांनी हे वक्तव्य मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी केले आहे.

मुंबई : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड राज्यभरात होत असलेल्या विविध आंदोलनात सहभागी होऊन भाजप आणि केंद्रसरकार निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका आंदोलनाच्या सभेत बोलताना त्यांनी 'हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नसल्याचे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाच्या मुद्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आपल्या भाषणात बोलताना आव्हाड म्हणाले होते की, ‘हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही. मात्र मुस्लिम सांगू शकतो, कारण त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे. आव्हाडांच्या या विधानावर राम कदम यांनी टीका केली आहे. आव्हाडांनी हे वक्तव्य मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी केले आहे. त्यातून केवळ हिंदू धर्म नव्हे, तर मुस्लिम समाजसोडून ज्या-ज्या धर्मामध्ये अंत्यविधी दफनविधीचा होत नाही, त्या धर्मांचा अपमान केला आहे, असे भाजप नेते राम कदम म्हणाले.

दरम्यान त्यांनी याच मुद्यावरून शिवसेनेवर सुद्धा टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दिवसाढवळ्या हिंदूंचा अपमान करतो आणि बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची भाषा करणारी शिवसेना गप्पा का? असा सवाल त्यांनी ठाकरेंना विचारला. तर बाळासाहेब जिंवत असते, तर त्यांनी हे खपवून घेतले नसते, असेही राम कदम यावेळी म्हणाले.