शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शहरातील तलावांची सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: July 15, 2017 02:31 IST

अग्रोळी येथील तलावात बुडून गुरुवारी दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाला

प्राची सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अग्रोळी येथील तलावात बुडून गुरुवारी दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी आहेत की नाही, याची शहानिशा प्रशासनाकडून केली जात नाही. शहरातील २४ तलावांवर महापालिकेने सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, अनेकदा हे सुरक्षारक्षक जागेवरच नसल्याचे पाहायला मिळते. तलावालगत असलेल्या उद्यानात रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा जमतो. सुरक्षेच्या दृष्टीने तलाव परिसर धोकादायक असून याठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार घडतात. त्यामुळे सकाळी सफाई कर्मचाऱ्यांना आधी मद्याच्या बाटल्या, फोडलेल्या काचा उचलाव्या लागतात. फुटलेल्या बाटल्या उचलताना अनेकदा सफाई कामगारांना इजाही होते. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस तलाव परिसरातील सुरक्षा धोक्यात येत असून परिसरात नागरिकांना असुरक्षित वाटते. नवी मुंबई परिसरात अग्रोळी, बेलापूर गाव, दारावे, करावे, किल्ले गावठाण, नेरुळ सेक्टर २०, शिरवणे, जुहूगाव, कोपरी, वाशीगाव, सानपाडा, तुर्भेगाव, खैरणे, कोपरखैरणे, महापे, सावलीगाव, गोठीवली, गुलनाली, राबाडा, तळवली, ऐरोली नाका, दिवा, बोरोला, खोकड अशा २४ तलावांचा समावेश आहे. तलावांचे सुशोभीकरण केल्यापासून या ठिकाणी वावर वाढला असून सुरक्षेच्या बाबतीत मात्र ठोस उपाययोजना राबविण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे. पावसाळ््याच्या दिवसात या ठिकाणी तरुणवर्ग मोठ्या संख्येने पोहण्यासाठी येत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या ठिकाणी पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे मात्र गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असूनही हे सुरक्षारक्षक जागेवर नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. या मार्गातील पथदिव्यांची देखभाल, दुरुस्तीकडे देखील कानाडोळा केला जात असल्याने अंधाराचा फायदा घेत अनेक गैरप्रकार होतात. >पालिकेचे तलाव व्हिजन कुचकामीतलाव व्हिजनअंतर्गत तलावातील गाळ काढणे, गॅबीयन वॉल बांधणे, गणेश विसर्जनाकरिता वेगळा भाग, घाट बांधणे, निर्माल्य कुंड उभारणे, धोबी घाट बांधणे, दगडाच्या ग्रील्स लावणे, आसनव्यवस्था आदी कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, ही काम पूर्ण झाल्यानंतर वर्ष उलटताच या ठिकाणी प्रशासनाचा चालढकलपणा समोर आला आहे. तलावाच्या सुरक्षेचा प्रश्नावर वारंवार प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या सुरक्षारक्षकांवर, त्यांच्या रोजच्या कामाकडे मात्र प्रशासकाचा उदासीन कारभार गुरुवारी झालेल्या घटनेमुळे समोर आला आहे. तलावाबरोबरच तलाव परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. - सरोज पाटील, नगरसेविका>तलाव परिसरात गर्दुल्ल्यांचा वावरतलाव परिसरात रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तलावाचे सुशोभीकरण केले असले तरी सुरक्षेअभावी या ठिकाणचे रूप पालटले आहे. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी वावरणाऱ्या गर्दुल्ल्यांना हटविण्याचा प्रयत्न केला असता ते दादागिरी करत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. >बेलापूर व घणसोली भागात अनुक्रमे ५ व ४ अशी सर्वाधिक तलावांची संख्या असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे २५ ते २८ टक्के क्षेत्र बेलापूर आणि घणसोली भागात व्यापले आहे.