शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'रॅली फॉर रिव्हर नाही तर रॅली फॉर मदर' , महाराष्ट्र शासन पूर्ण शक्तीने सहभागी होणार- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:00 IST

सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेली रॅली  ही रॅली फॉर रिव्हर नाही तर ती रॅली फॉर मदर आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन  पूर्ण शक्तीने सहभागी होईल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुंबई, दि. 19 - सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेली रॅली  ही रॅली फॉर रिव्हर नाही तर ती रॅली फॉर मदर आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन  पूर्ण शक्तीने सहभागी होईल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.काल नॅशनल स्पोर्टस् क्लब मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव, श्रीमती अमृता फडणवीस यांच्यासह सिने- उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.नदीला आपण माता मानतो आणि त्याच नदीला प्रदुषित करतो हे योग्य नाही. त्यामुळे सदगुरुंनी रॅली फॉर रिव्हर ची आणलेली संकल्पना ही राष्ट्र हिताची संकल्पना असून त्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे. वृक्ष लागवड किंवा रॅली फॉर रिव्हर हे फक्त कार्यक्रम नाहीत हे एक मिशन आहे. जे आपल्या सर्वांना मिळून पूर्ण करावयाचे आहे.  आईच्या ऋणाची परतफेड करता येत नाही पण वसुंधरा मातेचे ऋण वृक्ष लागवडीच्या माध्यमातून काही प्रमाणात फेडता येते. नदी ही जीवनरेखा आहे तर पाणी हे जीवन त्यामुळे आपलं जीवन असलेल्या नदी आणि वृक्ष संवर्धनासाठी  सर्वांनी या उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन ही त्यांनी केले.पर्यावरण शास्त्र फॅशनचा नाही काळजीचा विषय- सदगुरु जग्गी वासुदेवया पृथ्वीतलावरची आपली शेवटची पिढी आहे असे समजून आपण सर्व संपवत चाललो आहोत हे खुप चिंताजनक असून पर्यावरण शास्त्र  केवळ फॅशन नाही तर सर्वात मोठा काळजीचा विषय आहे असे सदगुरु जग्गी वासुदेव यांनी यावेळी म्हटले ते म्हणाले की, पर्यावरणाच्या संरक्षणात मानवी क्षमतांचा वापर करून घेणे शक्य आहे फक्त याची योग्य जाणीव होणे गरजेचे आहे. इच्छाशक्ती असेल तर आपण प्रदुषण नक्कीच कमी करू शकतो. भारतामध्ये ४ टक्के पाणी हे हिमालयीन नद्यांमधून येते तर उर्वरित पाणी हे फॉरेस्ट वर आधारित आहे हे आपले नशिब आहे. चांगले वन पाण्याचा जमीनीत चांगला निचरा करते. त्यामुळे पाणी, नदी वाचवायची असेल तर वनक्षेत्र वाढवणे, नदीकाठी मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. नदीचे नुकसान एका रात्रीत भरून निघणार नाही. हा विषय भावनिक होऊन हाताळण्याचा विषय नाही तर त्यासाठी शास्त्रीयदृष्टीकोनातून एक निश्चित कार्यक्रम आखणे आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी एकात्मिक धोरणाची गरज आहे. या कामासाठीची दीर्घकालन समर्पितता आवश्यक आहे. मातीला जीवन देण्याची गरज आहे. मातीतील ऑर्गेनिक कंटेट वाढवण्याची गरज आहे. नैसर्गिक स्त्रोतांचे शाश्वत प्रयत्नातून संवर्धन करणे गरजेचे आहे. पिक शेतीकडून आपल्याला फलोत्पादनाच्या शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणे शक्य होईल, त्यातून मातीचा पोत सुधारेल. परंतू हे करतांना कृषी आणि फळ प्रक्रिया उद्योग क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.रॅली फॉर रिव्हरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे ही सन्मानजनक बाब असल्याचे श्रीमती फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या की,   आपल्याला जी पृथ्वी मिळाली ती  त्याच वैभवाने किंबहून तिचे जतन आणि संवर्धन करून पुढच्या पिढीला देणे आवश्यक आहे, त्यासाठी सदगुरुंचे हे अभियान खुप महत्वाचे आहे. त्यातून मानवी जीवन फुलणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  महाराष्ट्राचे वनाच्छादन वाढवण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमास मोठ्याप्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी, कला, उद्योग, संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अतिशय उर्त्स्फुत वातावरणात या सर्वांनी रॅली  फॉर रिव्हर या उपक्रमाला आपला पाठिंबा जाहीर केला. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार