शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राळेगणसिद्धी ८० टक्के ‘स्मार्ट’

By admin | Updated: January 1, 2017 03:08 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाते. चाराबंदी, दारूबंदी, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाते. चाराबंदी, दारूबंदी, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक उपक्रमांमुळे या गावाचा लौकीक सर्वदूर झाला आहे. तसे पाहिले तर हे गाव प्रगतीशील आहे. पंचक्रोशीतील पहिला फोन याच गावात आल्याने हे गाव तसे ‘कनेक्ट’ आहे. आता तर प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आल्यामुळे आणि गावात इंटरनेटही पोहोचल्याने अण्णांचे राळेगणसिद्धी बरेचसे ‘स्मार्ट’ही बनले आहे. मात्र अद्याप पूर्णपणे ‘डिजिटल’ झालेले नाही. लहान मोठे व्यवहार अजुनही रोखीनेच होताना दिसत आहेत.राळेगणसिद्धीता. पारनेर जि. अहमदनगरजिल्ह्यापासून अंतर : ५५ किमीलोकसंख्या : ३००० हजार महाराष्ट्र बँक शाखा : एकसहकारी बँक : नाहीपतसंस्था : एक एटीएम : एकपारनेर बसस्थानकातून राळेगणसिद्धी बस आहेत. गावात अंदाजे आठशे ते नऊशे स्मार्ट फोन साक्षरतेचे प्रमाण ९६ टक्केसगळीकडे कॅशलेस आर्थिक व्यवहार सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराच्या प्रकारांना आळा बसेल. लोकांनीही आता डिजिटल माध्यामांचा वापर करून कॅशलेस व्यवहारांवर अधिक भर दिला पाहिजे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवकअद्याप सामान्य लोकांना डिजिटल व्यवहारांचे तंत्र अवगत झालेले नाही. परंतु मोबाइल वापरतात त्यांना डिजिटलचा सर्वाधिक फायदा होईल. खिशात रोख रक्कम नसली तरी फक्त डेबिट कार्ड असले तरी व्यवहार करू शकेल.- दादा पठारे, उपाध्यक्ष, आदर्श पतसंस्थाकॅशलेस व्यवहारांमुळे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांचा पैसे काढण्यासाठी व भरणा किंवा इतर व्यवहारांसाठी दुसऱ्या गावांना जाण्याचा वेळ वाचेल. आर्थिक उलाढाल यंत्रणा प्रगत होईल. जुन्या लोकांना याचा थोडा त्रास होईल, पण नव्या पिढीसाठी हा निर्णय चांगला आहे.- मंगल मापारी, सरपंच कॅशलेस व्यवहारांमुळे चोरीचे प्रमाण कमी होईल. सामान्य माणूस बँकिंग प्रक्रियेत येऊन बँकिंग व्यवहारात सज्ञान होईल हा सर्वात मोठा फायदा आहे.- भागवत पठारे, उद्योजकपारनेरसारख्या ग्रामीण भागातही दोन हजारांच्या बनावट नोटा काहींनी तयार केल्या होत्या. या नोटांचा फटका सामान्य व्यापाऱ्यांनाच बसत होता. आता कॅशलेस व्यवहारांमुळे सामान्य लोकांची फसवणूक थांबणार आहे.- संजय पठाडे, शिक्षक