शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

'चारही उमेदवार जिंकून दिल्लीत जाणार, मविआला विश्वास, भाजपाला टोला, शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 22:01 IST

Rajya Shabha Election: शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीत जाणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई - राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यातच महाविकास आघाडीतील समर्थकांच्या पाठिंब्याची गोळाबेरीज करून दुसरा खासदार राज्यसभेत पाठवण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी आज महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या आमदारांचं शक्तिप्रदर्शन मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले. तसेच ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीत जाणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच निवडणुकीनंतर दोन पार्ट्या करायच्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणी काही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीत जाणारच.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी तिसरा उमेदवार देणाऱ्या भाजपाला जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी राजकारणात थोडी सभ्यता असायला हरकत नव्हती पाहिजे.२२-२४ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. आता शेवटची राज्यसभेची निवणूक कधी झाली हे आठवावं लागते. एक परंपरा पाळली गेली असती तर बरं झालं असतं, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

दरम्यान, आज ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या मविआच्या बैठकील ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांचे पारडे जड झाले आहे.    

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक