शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Rajya Sabha Election: आमदार सुहास कांदे यांचे मत बाद का झाले?; निवडणूक आयोगानं सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 01:43 IST

निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे(Suhas Kande) यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी नाट्यमय घडामोड घडली आहे. भाजपाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेप घेतले. यानंतर भाजपा शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली. भाजपाने घेतलेल्या आक्षेपानंतर राज्यसभेची मतमोजणी थांबवण्यात आली होती. तब्बल ८ तासांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेतला. 

निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे(Suhas Kande) यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले. सुहास कांदे यांचे मत नेमकं का बाद झाले याबाबत निवडणूक आयोगाने त्यांच्या आदेशात स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने आदेशात म्हटलंय की. कांदे यांनी मतपत्रिका फोल्ड न करता पोलिंग एजेंटकडे नेली. पोलिंग एजेंटला दाखवताना त्यांची मतपत्रिका कॅमेऱ्यात तशी शेजारच्या क्युबिकलमध्ये दिसली. तसेच न दुमडलेली मतपत्रिका घेऊन ते फिरत होते आणि काहींशी बोलत होते. या सर्व प्रकारात मतपत्रिकेत कुणाला मत दिले हे दिसत असल्याने ते नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचे आदेश दिले आहेत. 

सुहास कांदे यांनी दिलं स्पष्टीकरण

मला अद्याप निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत मिळाली नाही. मी मतपत्रिका पक्षाच्या प्रतोदाला दाखवून फोल्ड केली होती. तो कागद इतका छोटा आहे. मी फोल्ड केले होते मग ती इतरांना कशी दिसेल. वरिष्ठांशी चर्चा करून या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ असं सुहास कांदे यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीच विजयी होईलमहाविकास आघाडीकडे जेवढे संख्याबळ लागते त्यापेक्षा अधिक मते आहेत. सहकारी आणि अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

मतमोजणीला सुरुवात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले होते. त्यातील १ मत बाद झाल्यानंतर आता २८४ मतांची मोजणी केली जाईल. या निवडणुकीत भाजपाचे पीयुष गोयल, अनिल बोंडे, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी मतांचा कोटा सुरक्षित ठेवला आहे. सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत आहे. अपक्ष, घटक पक्षांच्या मतांवर शिवसेनेच्या संजय पवार यांच्या विजयाचं भवितव्य ठरणार आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा