शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: आमदार सुहास कांदे यांचे मत बाद का झाले?; निवडणूक आयोगानं सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 01:43 IST

निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे(Suhas Kande) यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी नाट्यमय घडामोड घडली आहे. भाजपाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेप घेतले. यानंतर भाजपा शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली. भाजपाने घेतलेल्या आक्षेपानंतर राज्यसभेची मतमोजणी थांबवण्यात आली होती. तब्बल ८ तासांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेतला. 

निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे(Suhas Kande) यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले. सुहास कांदे यांचे मत नेमकं का बाद झाले याबाबत निवडणूक आयोगाने त्यांच्या आदेशात स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने आदेशात म्हटलंय की. कांदे यांनी मतपत्रिका फोल्ड न करता पोलिंग एजेंटकडे नेली. पोलिंग एजेंटला दाखवताना त्यांची मतपत्रिका कॅमेऱ्यात तशी शेजारच्या क्युबिकलमध्ये दिसली. तसेच न दुमडलेली मतपत्रिका घेऊन ते फिरत होते आणि काहींशी बोलत होते. या सर्व प्रकारात मतपत्रिकेत कुणाला मत दिले हे दिसत असल्याने ते नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचे आदेश दिले आहेत. 

सुहास कांदे यांनी दिलं स्पष्टीकरण

मला अद्याप निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत मिळाली नाही. मी मतपत्रिका पक्षाच्या प्रतोदाला दाखवून फोल्ड केली होती. तो कागद इतका छोटा आहे. मी फोल्ड केले होते मग ती इतरांना कशी दिसेल. वरिष्ठांशी चर्चा करून या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ असं सुहास कांदे यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीच विजयी होईलमहाविकास आघाडीकडे जेवढे संख्याबळ लागते त्यापेक्षा अधिक मते आहेत. सहकारी आणि अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

मतमोजणीला सुरुवात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले होते. त्यातील १ मत बाद झाल्यानंतर आता २८४ मतांची मोजणी केली जाईल. या निवडणुकीत भाजपाचे पीयुष गोयल, अनिल बोंडे, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी मतांचा कोटा सुरक्षित ठेवला आहे. सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत आहे. अपक्ष, घटक पक्षांच्या मतांवर शिवसेनेच्या संजय पवार यांच्या विजयाचं भवितव्य ठरणार आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा