शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेच्या मतमोजणीत ट्विस्ट; निकालासाठी मध्यरात्रीपर्यंत वाट पाहावी लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:52 IST

जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही प्रतिसाद येत नाही तोवर मतदानाला सुरूवात होणार नाही.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतदानावेळी भाजपा आमदार पराग अळवाणी यांनी महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेत ही मते बाद करावीत अशी मागणी केली. तर भाजपाचे नेते बावचळेत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी केला. परंतु आता याबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. 

जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही प्रतिसाद येत नाही तोवर मतदानाला सुरूवात होणार नाही. भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, भाजपाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले. महाराष्ट्र आणि हरियाणा येथे राज्यसभा निवडणुकीत उघडपणे मतदानाच्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले. त्याबाबत स्थानिक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानात झालेल्या नियमभंगामुळे ही मते बाद करावीत अशी मागणी आम्ही केलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?राज्यसभेच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. त्याच मविआची ३ मते बाद करावीत असं भाजपाने मागणी केली आहे.  पहिल्या फेरीत निवडून जाण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. राष्ट्रवादीने ९ मते शिवसेनेला दिली आहेत. भाजपाचा आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केल्यास महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवारासाठी अडचण होऊ शकते. 

२०१७ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या प्रकरणातही मते बाद झाल्याने पटेल यांचा विजय झाला होता. त्यावेळी एका जागेसाठी ४५ मतांची गरज होती. मात्र काँग्रेसची २ मते फुटली होती. तेव्हा काँग्रेसच्या त्या दोन आमदारांचे मत रद्द करण्यात यावे यासाठी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. भाजपानेही पीयुष गोयल, अरुण जेटली या दिग्गज नेत्यांची रवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. शेवटी निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. मध्यरात्रीपर्यंत निवडणूक आयोगाकडून या प्रकरणाचा तिढा सोडवला. त्यानंतर ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्यांचे २ मत बाद झाले. परिणामी विजयासाठी लागणारी मते ४५ वरून ४४ वर आली. पुन्हा मतमोजणी करत अहमद पटेल यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणुकीत तिढा निर्माण झाला आहे. त्याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. त्यामुळे मतमोजणी खोळंबली आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगShiv SenaशिवसेनाBJPभाजपा