शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: जिंकल्यावर पार्टी करू, मुख्यमंत्र्यानी सांगितले; ५० मिनिटांच्या बैठकीत काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 22:27 IST

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने हॉटेल ट्रायडंटला मविआच्या आमदारांची बैठक बोलावली.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत ७ उमेदवार असल्याने शिवसेनेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडीक यांच्यात थेट लढत आहे. केवळ एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपानं सगळी ताकद पणाला लावली आहे. यातच शिवसेनेने सर्व आमदारांना हॉटेल ट्रायडंट ठेवले आहे. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने हॉटेल ट्रायडंटला मविआच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला १२ अपक्षांनीही हजेरी लावली होती. ५० मिनिटं चाललेल्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मतदान करताना काळजी घ्या, आपलं ऐक्य दाखवा आपल्याला विजयाची पार्टीही करायची आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितले

बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीला जाणार आहेत. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा होती. मात्र २२-२४ वर्षांनी ही निवडणूक होतेय. बिनविरोध निवडणुकीची परंपरा पाळणं गरजेचे होते असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी आपल्याकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. 

बैठकीत काय घडलं?संध्याकाळी ६ वाजता हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होती. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह समर्थक आमदारांची उपस्थिती होती. या बैठकीला सुरूवातीला शरद पवार, जयंत पाटील उपस्थित झाले. त्यानंतर अजित पवार आणि नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील यांचे आगमन झाले. या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. सत्तापिपासू लोकांना आपल्याला दूर ठेवायचं आहे. जिंकल्यावर आपण पार्टी करू, विजयोत्सव करायचा आहे असं सांगितले. 

तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. अनेक अपक्ष आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे चारही उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास आहे. मते बाद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. प्रतोदाला मतदान दाखवून करायचं आहे त्यामुळे काही गडबड होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी