शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राजू शेट्टींनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:47 IST

कृषी राज्यमंत्री खोत सोलापूर दौºयावर; जनआंदोलन नसून ते मनआंदोलन, खोत यांचा खोचक टोला

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व बाकी सर्व घटक पक्षांचे नेते १५ दिवसांमध्ये एकत्र बसणार त्या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, या विषयावर चर्चा होणारपुढील ५ वर्षे राष्टÑवादी व काँग्रेसच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे, असा सल्लादेखील सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला

पंढरपूर : येणाºया विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम मशीनला विरोध करण्यासाठी विरोधी गटाचे सर्वजण एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन जनआंदोलन नसून, ते मनआंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात किती लोक सहभागी होतात, याची मला उत्सुकता लागली असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पंढरपुरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सदाभाऊ खोत म्हणाले, राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलन नेमके कोणत्या विषयासाठी करायचे हेच कळेना झाले आहे. आता त्यांच्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी झाले आहेत. राजू शेट्टी यांना आंदोलनाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी पुढील ५ वर्षे राष्टÑवादी व काँग्रेसच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे, असा सल्लादेखील सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे.

१५ दिवसांत जागा वाटपावर चर्चा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व बाकी सर्व घटक पक्षांचे नेते १५ दिवसांमध्ये एकत्र बसणार आहेत. त्या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, या विषयावर चर्चा होणार आहे. घटक पक्षांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे जाणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे