शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:10 IST

विरोधात असताना 'संघर्ष' यात्रा काढणाऱ्या फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रा काढली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात काढलेली महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा असल्याचा खोचक टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.

विरोधात असताना 'संघर्ष' यात्रा काढणाऱ्या फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रा काढली आहे. याच यात्रेतून भाजपने पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. मात्र या महाजनादेश यात्रेवरून राजू शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

सगळीकडे बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी मोठ्याप्रमाणावर आत्महत्या करतायत , निम्मा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला तर उर्वरित भागात महापूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र असे असताना ही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरूच असून, त्या यात्रेत हे प्रश्न दिसत नाही.असा आरोप सुद्धा त्यांनी आरोप केले.