शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

राजू शेट्टी यांचे ठरले! विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार, लवकरच ठिकाणे ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:18 IST

Raju Shetti News: शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी प्रश्नांवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Raju Shetti News: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात भाष्य केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,  शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही. कोल्हापूर-नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे. मग या महामार्गाची गरज काय? समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला, त्याच्या केवळ ४० टक्के मोबदला मिळणार आहे. राज्यात चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही. सर्व पक्षीय नेत्याच्या भूमिकेवर संशय आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ ठिकाणी लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ३० ते ३५ जागा लढू शकतो. परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. राज्यात एका दिवशी २५० शेतकरी आत्महत्या होत आहे. हरितक्रांती चे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या गावातही शेतकरी आत्महत्या झाली. हे या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

दरम्यान, सरकारने कापूस, सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी समजून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. कर्जबाजारी शेतकरी देश सोडून पळून जात नाही तर जीवन जगणे सोडून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. केंद्र व राज्य सरकार कोट्यवधी रुपयांच्या योजनांची घोषणा करतात. सामान्य माणसाचे जीएसटीचे पैसे जमा आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी