शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

राजू शेट्टी यांचे ठरले! विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार, लवकरच ठिकाणे ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:18 IST

Raju Shetti News: शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी प्रश्नांवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Raju Shetti News: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात भाष्य केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,  शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही. कोल्हापूर-नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे. मग या महामार्गाची गरज काय? समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला, त्याच्या केवळ ४० टक्के मोबदला मिळणार आहे. राज्यात चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही. सर्व पक्षीय नेत्याच्या भूमिकेवर संशय आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ ठिकाणी लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ३० ते ३५ जागा लढू शकतो. परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. राज्यात एका दिवशी २५० शेतकरी आत्महत्या होत आहे. हरितक्रांती चे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या गावातही शेतकरी आत्महत्या झाली. हे या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

दरम्यान, सरकारने कापूस, सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी समजून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. कर्जबाजारी शेतकरी देश सोडून पळून जात नाही तर जीवन जगणे सोडून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. केंद्र व राज्य सरकार कोट्यवधी रुपयांच्या योजनांची घोषणा करतात. सामान्य माणसाचे जीएसटीचे पैसे जमा आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी