शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

राजू शेट्टी यांचे ठरले! विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार, लवकरच ठिकाणे ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:18 IST

Raju Shetti News: शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी प्रश्नांवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Raju Shetti News: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात भाष्य केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,  शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही. कोल्हापूर-नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे. मग या महामार्गाची गरज काय? समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला, त्याच्या केवळ ४० टक्के मोबदला मिळणार आहे. राज्यात चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही. सर्व पक्षीय नेत्याच्या भूमिकेवर संशय आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ ठिकाणी लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ३० ते ३५ जागा लढू शकतो. परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. राज्यात एका दिवशी २५० शेतकरी आत्महत्या होत आहे. हरितक्रांती चे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या गावातही शेतकरी आत्महत्या झाली. हे या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

दरम्यान, सरकारने कापूस, सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी समजून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. कर्जबाजारी शेतकरी देश सोडून पळून जात नाही तर जीवन जगणे सोडून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. केंद्र व राज्य सरकार कोट्यवधी रुपयांच्या योजनांची घोषणा करतात. सामान्य माणसाचे जीएसटीचे पैसे जमा आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी