शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानने नवे १९ जिल्हे केले, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांचे काय? २०२१च्या जनगणना अहवालासाठी अडले जिल्हानिर्मितीचे घाेडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 07:07 IST

- दीपक भातुसे  लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राजस्थानने नव्या १९ जिल्ह्यांची निर्मिती केल्यानंतर महाराष्ट्रातील अडलेल्या नव्या जिल्हानिर्मितीची चर्चा ...

- दीपक भातुसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राजस्थानने नव्या १९ जिल्ह्यांची निर्मिती केल्यानंतर महाराष्ट्रातील अडलेल्या नव्या जिल्हानिर्मितीची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नव्या जिल्हानिर्मितीचे निकष ठरवण्यासाठी शासनाने एक समितीही स्थापन केली होती. मात्र समितीने दिलेल्या अभिप्रायामुळे राज्यातील नव्या जिल्हानिर्मितीचे घोडे अडलेले आहे.  

शासनाने २०१४ साली नव्या जिल्हानिर्मितीचे निकष ठरवण्यासाठी महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीत नियोजन, वित्त, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, सर्व विभागीय आयुक्त यांचा समावेश होता. २०१६ साली या समितीने आपला अभिप्राय सरकारला सादर केला. ‘नव्या जिल्हानिर्मितीचे निकष ठरविल्यास लोकांकडून मोठ्या प्रमाणात नव्या जिल्हानिर्मितीच्या मागण्या पुढे येऊ शकतात. तसेच या धोरणाच्या आधारे जिल्हानिर्मितीसाठी जनहित याचिकेद्वारे न्यायालयाकडून आदेशही आणले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत काही हजार कोटीचा आर्थिक भार राज्यावर येऊ शकतो. त्यामुळे सद्यःस्थितीत धोरण न ठरविता सन २०२१ च्या जनगणनेच्या आधारे नवीन निकष निश्चित करणे योग्य ठरेल,’ असा अभिप्राय समितीने सरकारला दिला. त्यामुळे २०२१च्या जनगणनेचे आकडे येत नाहीत, तोपर्यंत राज्यात नव्या जिल्हानिर्मितीच्या हालचाली होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. 

१८ जिल्ह्यांचे विभाजन? मागील काही वर्षांत राज्य सरकारकडे विविध माध्यमांतून जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करून नवे जिल्हे निर्माण करण्याची मागणी आलेली आहे. समितीच्या अहवालानुसार ६७ नवे जिल्हे करण्याची मागणी होत आहे; तर ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार १८ जिल्ह्यांचे विभाजन करून नवे २२ जिल्हे निर्माण करण्याची जोरदार मागणी आहे.

तोवर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भागवणार n जोपर्यंत विभाजन होत नाही, तोपर्यंत जनतेच्या प्रशासकीय सोयीसाठी बीडमधील अंबाजोगाई, नाशिकमधील मालेगाव, पालघरमधील जव्हार आणि गडचिरोलीमधील अहेरी इथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. n चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे कार्यालय कार्यान्वित करण्याची शिफारस या समितीने केली होती. त्यातील चिमूरचे कार्यालय कार्यान्वित झाले असून शिर्डीच्या कार्यालयाचे उद्घाटन ११ ऑगस्ट रोजी होत आहे.

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतीक्षा.

₹५०० कोटींचा एका जिल्ह्यासाठी खर्च  n एका जिल्हानिर्मितीसाठी साधारणतः ४०० ते ५०० कोटी खर्च येतो. नव्या जिल्ह्यासाठी ५५ ते ६० नवी कार्यालये बांधावी लागतात. n यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हा न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता कार्यालय, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता कार्यालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यास, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अशा विविध कार्यालयांचा समावेश. n या कार्यालयांसाठी पदनिर्मिती, पदभरतीही करावी लागते.

अनेक जिल्हे लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय हाेत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र