शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

"जो भाऊ तुमच्यासोबत लहानाचा मोठा झाला..."; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 07:40 IST

शिवडी येथील मनसेच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आदित्यची बाजू घेतल्याबद्दल तुमचे आभार मानलेत त्यावर शर्मिला ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली

मुंबई - आभार मानायची वेळ मला आयुष्यात उद्धव ठाकरेंनी कधीच दिली नाही.किणी प्रकरणापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत बसतात. निदान जो भाऊ तुमच्यासोबत लहानापासून मोठा झाला. त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवला असता ना तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ आली असती. जी आता त्यांच्यावर आलीय अशा शब्दात राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

शिवडी येथील मनसेच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आदित्यची बाजू घेतल्याबद्दल तुमचे आभार मानलेत त्यावर शर्मिला ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला. तो असे करेल मला वाटत नाही. परंतु तुम्ही ज्या भावासोबत मोठे झालात परंतु किणी प्रकरणावेळी मदत का केली नाही? किणी प्रकरणावरून आजपर्यंत टोमणे देणे कधी थांबवलं आहे? सतत टोमणे देत राहतात. तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्हीदेखील आभार मानू असं त्यांनी म्हटलं. 

तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला कुणी अडवलं होतं? अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचे हात कुणी धरले होते का? कोविड काही महिन्यांनी सुरू झाला. धारावीचा विकास सरकारनं करावा असं तुम्हाला वाटत होते मग तुम्ही निर्णय घ्यायला हवा होता.तुम्हाला कुणी अडवले होते? कोणतेही चांगले निर्णय घ्यायला तुम्हाला कुणी थांबवले होते? राज्यात मराठ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज जे विरोधी पक्षात असतील किंवा सर्वच पक्ष असतील मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणतायेत मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला कुणी अडवलं होते, मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. 

दरम्यान,सर्व गोष्टीला कोविडचे कारण दिलं जाते, परंतु कोविड काही महिन्यांनी सुरू झाला. मराठ्यांचे आंदोलन हे वर्षानुवर्षे सुरू आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचे होते मग तेव्हा द्यायचे होते. तुम्ही विधानसभेत विधेयक पास करायचे होते. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तुम्ही बहुमतात सरकारमध्ये होता मग तेव्हा आरक्षण देऊन टाकायचे होते. धारावीचा विकास सरकारला करायचा होता मग करून टाकायचा. कुणी तुमचे हात धरले होते? आपल्याकडे टाटांसारखे अनेक ब्राँड आहेत. धारावीच्या विकासाचे टेंडर काढून त्यात जो कुणी चांगला आहे त्याला काम द्यायला हवे होते असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

टॅग्स :sharmila thackerayशर्मिला ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे