शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

उत्तर सभेत राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदींकडे दोन मागण्या, एक समान नागरी कायदा अन् दुसरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:43 IST

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण...

ठाणे - मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर आज राज ठाकरे यांची तोफ ठाण्यात धडाडली. राज यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचे पडसाद राज्यभर उमटले. त्यांच्या त्या भाषणानंतर राज्यातील काही पक्षांतील नेत्यांच्याही विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांना उत्तर म्हणून, आज राज ठारे यांनी ही उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे, समान नागरी कायदा करावा आणि देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा काही कायदा करावा, अशा दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत.

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण या लोकसंख्येने एकदिवस देश फुटेल. यामुळे या गोष्टी होणे आवश्यक आहे.

राज म्हणाले, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला, असे बोलतात, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला हा गैरसमज, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. तेव्हा ज्या गोष्टींसाठी मला विरोध करायचा होता, तेव्हा मी पंतप्रधान मोदींना विरोध केला. गरज पडली तर पुन्हा करीन. पण कलम 370 रद्द केल्यानंतर, अभिनंदन करणारे पहिले ट्विट माझेच होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा पहिला माणूस मीच होतो. त्यानंतर बाकी लोक बोलले, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

नोटीशीसंदर्भात काय म्हणाले राज -आय एल अँड एफ एस नावाची कंपनी होती, मी त्यात होतो. नंतर ते झेपायचे नाही म्हणून एका वर्षात त्यातून  बाहेर पडलो. त्या कंपनीसंदर्भातील ती नोटीस होती. ती नोटीस आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवारांना येतेय म्हणून चाहूल लागली, तर एवढे नाटक केले. हाताने जर पाप केले नाही तर नोटीसा राजकीय असो अथवा कायदेशीर मी भीक घालत नाही." असेही राज यावेळी म्हणाले. त्यामुळे मला उद्या एखादी गोष्ट नाही पटली, तर मी परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिले म्हणून, टीका करायची, असे करणार नाही. तसेच आता तुम्ही शेण खाल्ले आहे, यामुळे आता तुमच्यावर टीका करणार, असहे राज यांनी रोखठोक शब्दांत सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी