शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही; राज ठाकरेंचं मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 12:28 IST

मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीज रचली जाणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीज रचली जाणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईमध्ये रस्त्यांवर लोकांना चालणं मुश्किल मग बुलेट ट्रेन कशाला? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे.

मुंबई- शहरातील रेल्वे स्थानकांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. बुलेट ट्रेनचे जे काही बांधकाम करायचे असेल ते मोदींनी आपल्या गुजरातमध्ये करावे. पण, मुंबईत बळजबरीने बुलेट ट्रेनचे काम करायचा प्रयत्न केल्यास त्याला ‘मनसे’कडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं सांगत राज यांनी थेट मोदींना आव्हान दिलं आहे.आपल्याकडे आहेत त्या गोष्टी होत नाहीत. आणि नवीन गोष्टी सरकारकडून आणल्या जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मुंबईमधील रेल्वे स्टेशन आणि ट्रेनची परिस्थिती जोपर्यंत सुधारली जाणार नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही, असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली आहे. इतकं खोटं बोलणार सरकार आणि पंतप्रधान कधी पाहिला नाही, अस म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कामाचं कौतुक करत रेल्वे मंत्री बदलण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं कळलं नाही ? बुलेट ट्रेनच्या लाडापायी प्रभुंना हटवलं पियूष गोयल यांना आणलं पियूष गोयल काय आधी टीसी होते, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हंटलं. शुक्रवारी एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. 

शुक्रवारी एल्फिन्स्टन स्टेशनवर घडलेल्या घटनेबद्दल राज ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी आहे राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. पण  एल्फिन्स्टनवरील घटना घडणार नव्हती असं नाही, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.  मुंबईत घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे 5 ऑक्टोबर रोजी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर  मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये राज ठाकरे स्वतः सहभाग घेणार असून मुंबईकरांनीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.  या मोर्चातून सरकारला त्यांच्या कामाबद्दल जाब विचारणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

सरकार कुठलंही असो फरक काहीही पडत नाही. आधीचं सरकार असताना काही फरक पडला नाही,  सरकार बदलल्यानंतर काहीही फरक पडला नाही फक्त नोटेचा रंग बदलला आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.  

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. सुरूवातीला रेल्वेची उंची मोजणारे किरीट सोमय्या आता गप्प का? साडेतीन वर्षापासून ते गप्प आहेत, सत्ता आल्यावर आधी पाठपुरावा करणारे आता झोपले, असं राज ठाकरेंनी म्हंटलं आहे. विरोधी पक्षात असताना किरीट सोमय्या ईव्हीएम मशिनच्या मुद्द्यावर सडकून टिका करत होते, आता ते गप्प का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

परप्रांतियांमुळे पायाभूत सुविधांना बोजवारामुंबईमध्ये परप्रांतियांचे लोंढे येणं काही थांबत नाही. दररोज हजारो लोक मुंबईत येतात. त्यामुळे आधीच कोसळलेल्या पायाभूत सोयीसुविधा अपूऱ्या पडत असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 

मुंबईत माणसं मारायला दहशवादी कशाला हवेत?मुंबईमध्ये दररोज काहीना काही घडल्याचं ऐकायला मिळतं. अनेक लोक मारली जातात. मुंबईतील माणसं मारायला आपली रेल्वे सेवा पुरेशी आहेत. त्यासाठी पाकिस्तानातीला दहशतवादी किंवा चीनची काय गरज, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे