शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

देशात अप्रत्यक्ष आणीबाणी, राज ठाकरेंनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 06:02 IST

देशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला

मुंबई : देशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राजकीय फायद्यांसाठी चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या सभागृहात गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्य संपादक संदीप प्रधान आणिज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी विविध विषयांवर राज ठाकरे यांना बोलते केले. अलीकडेच अतिवृष्टीमुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. याबाबत विचारले असता टक्केवारीच्या राजकारणामुळे मुंबईचा विचका झाला आहे. मुंबईत महापालिकेसह आठ ते नऊ यंत्रणा कार्यरत आहेत. त्यांच्यात अजिबात समन्वय नाही. या यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक असल्याची भूमिका विलासराव देशमुखांच्या काळापासून मांडल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियान राबवणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. अल्पसंख्याक दर्जा नसलेल्या शाळांच्या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा झाली. आधी याबाबत सरकारशी बोललो; परंतु मार्ग न निघाल्याने भागवतांशी चर्चा केल्याचे राज यांनी सांगितले.सरकारी नियमांचा आधार घेत अल्पसंख्याक दर्जा नसलेल्या शाळांमध्ये अल्पसंख्याक मुले येतात. त्यानंतर या शाळांमधील राष्ट्रगीत किंवा सरस्वती वंदनेसारख्या गोष्टींना विरोध सुरू होतो. राष्ट्रगीत सुरू झाल्यावरही मुले आणि त्यांचे पालक शाळेबाहेर उभे असतात. हा प्रकार चुकीचा आहे. एकीकडे अल्पसंख्याक शाळांना कसलेच नियम नाही आणि दुसरीकडे इतर शाळांमध्ये असे प्रकार घडत असल्याबद्दल राज यांनी नाराजी व्यक्त केली.फक्त मतांसाठी काही राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील एकोपा घालविला आहे. आधी महापुरुष जातीत विभागले होते; आता देवांचीसुद्धा विभागणी झाली आहे, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रातील मुलामुलींना नोकºया दिल्यास आरक्षणाची गरजच भासणार नाही. मोर्चा वगैरेंनी काही होणार नाही. काही लोकांना त्याचे राजकारण करायचे असल्याची टीकाही राज यांनी केली.भाजपा आणि मनसे एकत्र येणार का, या प्रश्नावर आधी त्यांना डोळा तरी मारू द्या. त्यांचा काय प्रस्ताव येतो हे पाहिल्याशिवाय काय बोलणार, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. मनसे-शिवसेना एकत्र येणार का, या प्रश्नावर गणपती बाप्पाकडे पाहत परमेश्वरालाच माहीत, असे उत्तर राज यांनी दिले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी