शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 09:45 IST

शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी २००० साली राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची सुरूवात केली होती. पण, ते परत राजकारणात आले. राज ठाकरेंसोबत असं काय घडलं?

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेतील राजकारणाला कंटाळून राजकारणच सोडणार होतो, तसा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट केला. एका कार्यक्रमात ते बोलत होते. '२००० साली पक्षातील (शिवसेनेतील) राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता. मी हळूहळू राजकारण सोडत होतो; पण नाडियावालांमुळे पुन्हा राजकारणात आलो", असे राज ठाकरे म्हणाले.

शिवसेनेत असताना राज ठाकरे सोडणार होते राजकारण

एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मी २००० साली, ज्यावेळी एका वेगळ्या पक्षात (शिवसेनेत) होतो; त्यावेळी त्या पक्षात जे काही राजकारण सुरू होते, त्याला कंटाळून मी रिव्हर्सचा गियर टाकला होता. मला असं वाटतं होतं की, नको ते राजकारण! मला त्या राजकारणात जायचंच नाही. माझी तशी इच्छाच नाहीये. मला असले गोंधळ घालायचे नव्हते. मला कोणतेही धक्के द्यायचे नव्हते." 

साजिद नाडियावालांमुळे पुन्हा राजकारणात आलो -राज ठाकरे

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मी राजकारण हळूहळू सोडत होतो. त्यावेळी मी साजिद नाडियावालांना अनेकदा भेटायचो आणि बोलायचो की, आपल्याला फिल्म प्रोडक्शन सुरू करायचं आहे. मला फिल्म प्रोड्यूस करायच्या आहेत, वगैरे वगैरे. एकेदिवशी मी पुन्हा राजकारणात वळण्याचे कारण साजिद नाडियावाला आहेत. हेही त्याचं एक अंग आहेत", अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

नाडियावाला राज ठाकरेंना काय म्हणालेले?

"त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, राज भाई मी एक प्रोड्यूसर आहे. प्रोड्यूसर कशाप्रकारे काम करतात ते मला माहिती आहे. काय काय करावं लागतं, ते मला माहिती आहे. राज ठाकरेंना प्रोड्यूसर बनून ते करताना मी बघू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात, तिथेच राहा. चित्रपट बनत राहणार. त्यानंतर मी परत राजकारणात सक्रिय झालो आणि परत त्या गोष्टी सुरू झाल्या", असा किस्सा राज ठाकरेंनी उपस्थितांना सांगितला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMumbaiमुंबई