शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 09:45 IST

शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी २००० साली राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची सुरूवात केली होती. पण, ते परत राजकारणात आले. राज ठाकरेंसोबत असं काय घडलं?

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेतील राजकारणाला कंटाळून राजकारणच सोडणार होतो, तसा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट केला. एका कार्यक्रमात ते बोलत होते. '२००० साली पक्षातील (शिवसेनेतील) राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता. मी हळूहळू राजकारण सोडत होतो; पण नाडियावालांमुळे पुन्हा राजकारणात आलो", असे राज ठाकरे म्हणाले.

शिवसेनेत असताना राज ठाकरे सोडणार होते राजकारण

एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मी २००० साली, ज्यावेळी एका वेगळ्या पक्षात (शिवसेनेत) होतो; त्यावेळी त्या पक्षात जे काही राजकारण सुरू होते, त्याला कंटाळून मी रिव्हर्सचा गियर टाकला होता. मला असं वाटतं होतं की, नको ते राजकारण! मला त्या राजकारणात जायचंच नाही. माझी तशी इच्छाच नाहीये. मला असले गोंधळ घालायचे नव्हते. मला कोणतेही धक्के द्यायचे नव्हते." 

साजिद नाडियावालांमुळे पुन्हा राजकारणात आलो -राज ठाकरे

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मी राजकारण हळूहळू सोडत होतो. त्यावेळी मी साजिद नाडियावालांना अनेकदा भेटायचो आणि बोलायचो की, आपल्याला फिल्म प्रोडक्शन सुरू करायचं आहे. मला फिल्म प्रोड्यूस करायच्या आहेत, वगैरे वगैरे. एकेदिवशी मी पुन्हा राजकारणात वळण्याचे कारण साजिद नाडियावाला आहेत. हेही त्याचं एक अंग आहेत", अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

नाडियावाला राज ठाकरेंना काय म्हणालेले?

"त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, राज भाई मी एक प्रोड्यूसर आहे. प्रोड्यूसर कशाप्रकारे काम करतात ते मला माहिती आहे. काय काय करावं लागतं, ते मला माहिती आहे. राज ठाकरेंना प्रोड्यूसर बनून ते करताना मी बघू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात, तिथेच राहा. चित्रपट बनत राहणार. त्यानंतर मी परत राजकारणात सक्रिय झालो आणि परत त्या गोष्टी सुरू झाल्या", असा किस्सा राज ठाकरेंनी उपस्थितांना सांगितला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMumbaiमुंबई