शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा? ...एवढंही समजत नाही? भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:35 IST

मी महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांनाही हेच सांगतो, की जिकडे मौलवी ऐकत नाहीत, भोंगे मोठ्या आवाजात वाजतील, तिकडे डबल आवाजात हणुमान चालिसा लावा, असेही राज म्हणाले.

मुंबई - राज्यातील भोंग्यांचा मुद्दा हा सामाजिक आहे. धार्मिक नाही. सणासुदीच्या वेळी, सभेसाठी, एखाद्या काही कारणासाठी ठीक आहे. पण वर्षभरासाठी नाही. तुम्हाला कुणाला ऐकवायचे आहे. आम्हाला नाही ऐकायचे. या भोंग्यांमुळे, आजारी माणसांना महिलांना, लहाण मुलांना विद्यार्थ्यांना त्रस होतो. एवढेही समजत नाही, असे म्हणत, माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.  

राज ठाकरे म्हणाले, हा विषय केवळ मशिदींसाठीचाच नाही तर, मंदिरांवरील भोंगेही खाली आले पाहिजे. ज्या-ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होईल, ते-ते बंद झाले पाहीजे. विश्वास नांगरे पाटील यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले, की एवढे अर्ज आले होते. एवढ्यांना परवानगी दिली. पण, महाराष्ट्रातील बहुतांश मशिदी या अनधिकृत आहेत. म्हणजेच त्यावरील भोंगेही अनधिकृतच, मग त्यावर भोंगे लावण्यासाठी सरकार अधिकृत परवानगी कसे देऊ शकते. हे समजण्या पलिकडे आहे. अशी परवानगी कशी दिली जाऊ शकते, असेही राज म्हणाले. एवढेच नाही, तर आम्हाला देताना तुम्ही एक दिवसाची, दहा दिवसांची परवानगी देणार. मग त्यांना वर्षाची परवानगी कशी दिली जाते? असा सवालही राज यांनी यावेळी केला.

भोंग्यांचा मुद्दा सामाजिक आहे. पण ते त्यांच्या धर्माला घट्ट राहणार असतील, तर आम्हालाही तेवढेच घट्ट व्हावे लागेल. ज्या मशिदींवर सकाळी अजान झाली नाही. त्यांनी पुढेही न्यायालयाच्या आदेशानुसारच ठरलेल्या डेसीबलमध्येच  अजान द्यावी. एवढेच नाही, तर दिवसभरातल्या अजानही  त्याच आवाजात दिल्या गेल्या पाहिजे. अन्यथा हनुमान चालिसा चालणार. आम्हालाही महाराष्ट्रात शांतताच हवी आहे. पण त्यांनी धार्मिक वळण द्यायचा विचार केला, तर आम्हीही धार्मिक वळण देऊ, असेही राज म्हणाले.

हा विषय जोवर निकाली लागत नाही, तोवर हा मुद्दा कायम राहणार. हा प्रश्न केवळ सकाळच्या अजानपुरता नाही. हा विषय दिवसभराचा आहे. जर भोंग्यांचा वापर केला गेला, तर आमचे लोकही त्या-त्या वेळेवर हणुमान चालिसा वाजवणार. एवढेच नाही, तर हा विषय एक दिवसाचा नाही, मी महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांनाही हेच सांगतो, की जिकडे मौलवी ऐकत नाहीत, भोंगे मोठ्या आवाजात वाजतील, तिकडे डबल आवाजात हणुमान चालिसा लावा, असेही राज म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसे