शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 23:49 IST

सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका केली होती त्यास उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे बोलत होते .

लोकमत न्यूज नेटवर्क 

भिवंडी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते ,गुदगुल्या होत होत्या ,आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय अशी टीका  महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवारी रात्री ते भिवंडीतील हायवे दिवे येथे जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने बनविण्यात आलेल्या कै मनीबाई मोरेश्वर पाटील बलोद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी केली.

         सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका केली होती त्यास उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे बोलत होते .राज ठाकरे सत्य बोलत असल्याने त्यांचे घाव महाविकास आघाडी सरकारच्या वर्मी लागतात. भारतीय जनता पार्टीला कोणालाही समोर करायची गरज नाही .असे सांगत भारतीय जनता पार्टी सक्षम आहे .आम्ही पोलखोल यात्रा सुरू केली आहे .दररोज पोलखोल करतोय त्यामुळे सरकार आणि सरकार मधील पक्ष व्यथित झाले आहेत.त्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत .पण आम्ही घाबरणार नाहीत त्यांनी किती ही हल्ले केले तरी आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज पोलखोल करीत राहणार असे वक्तव्य शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी  केले .

           या प्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील ,आमदार निरंजन डावखरे डावखरे,माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत पाटील,जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील,भिवंडी पालिका सभागृह नेते सुमित पाटील, संदिप लेले, माजी सरपंच सिद्धेश पाटील, दिवे अंजुर ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती पाटील, उपसरपंच अजित वसंत म्हात्रे आदी उपस्थिती होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस