शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Raj Thackeray: राज ठाकरेंचं देशभरातील हिंदुंना आवाहन; ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:38 IST

ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली.

ठाणे – गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने सर्व मौलवींना बोलावून भोंगे हटवण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा ३ मेनंतर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाची भूमिका मी आज आणली नाही. पाकिस्तानी कलाकारांना हाकलवून देणारा पक्ष कोणता होता? मुंब्र्यातून अतिरेकी सापडले, वस्तरा कसा सापडेल, दाढीच करत नाही. आझाद मैदानावर रझा अकादमीनं काय धुडघूस घातला. पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, महिला पोलिसांचा शारिरीक छळ केला. त्यावर कुणीही काहीही बोलले नाही. त्यावर मनसेना मोर्चा काढला. या मोर्च्यामुळेच पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांना पदावरून काढण्यात आले. आम्ही भोंग्याची भूमिका कायम मांडली. कुठली दंगल तेढ निर्माण करायचा नाही. पण १२ ते ३ मे महाराष्ट्रातील भोंगे खाली ठरवल्यास आमच्या कडून कोणताही त्रास होणार नाही असं त्यांनी सांगितले.

दम असेल तर राज ठाकरेंना जेलमध्ये टाकून बघा; राजू पाटील यांचं अबू आझमींना 'ओपन चॅलेंज'

तसेच माझ्याबद्दल बोलले ईडीची नोटीस आली मी बदललो, आजही मला ईडीची नोटीस आली तरी जाईल पण ईडीनं नुसती संपत्ती जप्त केली तर पत्रकार परिषदेतून जाहीर शिव्या द्यायला लागले.तुम्ही शिवसेनेचे आहात की राष्ट्रवादीचे? अशा प्रवृत्तीच्या लोकांना आजोबा प्रबोधनकारांनी चांगलं वाक्य म्हटलं होतं, हे सगळे लवंडे आहेत अशा शब्दात राज ठाकरेंनी शिवसेना नेते संजय राऊतांचा समाचार घेतला.

घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला हजर

मी भूमिका बदलत नाही

मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. एका वर्षाच्या आत मी कोहिनूरमधून बाहेर पडलो. त्या कंपनीचा तपास सुरू झाला तेव्हा मला नोटीस आली आणि ईडीच्या कार्यालयात गेलो. ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही. ज्या गोष्टी मला नाही पटल्या ते जाहीरपणे बोललो. कलम ३७० रद्द केले त्यावर अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा मी पहिला होतो. या देशात समान नागरी कायदा आणा, या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा अशा २ मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण कराव्यात असं राज ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेHinduहिंदू