शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

Raj Thackeray: राज ठाकरेंचं देशभरातील हिंदुंना आवाहन; ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:38 IST

ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली.

ठाणे – गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने सर्व मौलवींना बोलावून भोंगे हटवण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा ३ मेनंतर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाची भूमिका मी आज आणली नाही. पाकिस्तानी कलाकारांना हाकलवून देणारा पक्ष कोणता होता? मुंब्र्यातून अतिरेकी सापडले, वस्तरा कसा सापडेल, दाढीच करत नाही. आझाद मैदानावर रझा अकादमीनं काय धुडघूस घातला. पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, महिला पोलिसांचा शारिरीक छळ केला. त्यावर कुणीही काहीही बोलले नाही. त्यावर मनसेना मोर्चा काढला. या मोर्च्यामुळेच पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांना पदावरून काढण्यात आले. आम्ही भोंग्याची भूमिका कायम मांडली. कुठली दंगल तेढ निर्माण करायचा नाही. पण १२ ते ३ मे महाराष्ट्रातील भोंगे खाली ठरवल्यास आमच्या कडून कोणताही त्रास होणार नाही असं त्यांनी सांगितले.

दम असेल तर राज ठाकरेंना जेलमध्ये टाकून बघा; राजू पाटील यांचं अबू आझमींना 'ओपन चॅलेंज'

तसेच माझ्याबद्दल बोलले ईडीची नोटीस आली मी बदललो, आजही मला ईडीची नोटीस आली तरी जाईल पण ईडीनं नुसती संपत्ती जप्त केली तर पत्रकार परिषदेतून जाहीर शिव्या द्यायला लागले.तुम्ही शिवसेनेचे आहात की राष्ट्रवादीचे? अशा प्रवृत्तीच्या लोकांना आजोबा प्रबोधनकारांनी चांगलं वाक्य म्हटलं होतं, हे सगळे लवंडे आहेत अशा शब्दात राज ठाकरेंनी शिवसेना नेते संजय राऊतांचा समाचार घेतला.

घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला हजर

मी भूमिका बदलत नाही

मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. एका वर्षाच्या आत मी कोहिनूरमधून बाहेर पडलो. त्या कंपनीचा तपास सुरू झाला तेव्हा मला नोटीस आली आणि ईडीच्या कार्यालयात गेलो. ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही. ज्या गोष्टी मला नाही पटल्या ते जाहीरपणे बोललो. कलम ३७० रद्द केले त्यावर अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा मी पहिला होतो. या देशात समान नागरी कायदा आणा, या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा अशा २ मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण कराव्यात असं राज ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेHinduहिंदू