शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मनसेला मोठा धक्का! ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; राजीनामा सत्र सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:52 IST

मुंबई आणि मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळावा आणि त्यानंतर लगेचच ठाण्यात आलेल्या उत्तरसभेत मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील मुद्दा लावून धरला. मशिदींवरील भोंगे उतरवावेच लागतील, अशी ठाम भूमिका घेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिले आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरून मनसेत दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईसह मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांचा आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे. आता खुद्द मनसेमधून राज ठाकरेंच्या भूमिकेला कडवा विरोध होताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पुण्यातील मनसेचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला होता. यानंतर मनसेच्या मुस्लीम बांधव पदाधिकाऱ्यांमध्ये यावरून नाराजी असल्याचे चित्र राजीनामा सत्रावरून दिसत आहे.

मुंबई, मराठवाड्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई आणि मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमूद करण्यात आली आहे. यामध्ये सचिव, शहराध्यक्ष. प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

दरम्यान, मनसेचे कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला. यावेळी इरफान शेख यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट देखील टाकली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’, या मथळ्याखाली इरफान यांनी फेसबुकवर राजीनाम्याची पोस्ट लिहिली आहे. खरे तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असे वाटले नव्हते. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपले सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत इरफान शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे