शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

राज ठाकरेंचे 'ते' वक्तव्य प्रसिद्धीसाठीच- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 06:18 IST

अकाेल्यात पत्रकारांशी साधला संवाद

अकाेला : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे, त्यामुळे ते राज्यातील वीजबिलाच्या प्रश्नावर बेछुट आराेप करतात, असा टाेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यासाठी रविवारी अकाेल्यात आले हाेते. यावेळी सकाळी त्यांनी जलसंपदा विभागाचा आढावा घेतला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वीजबिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर आहे. मात्र, एवढया महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणे हास्यास्पद असल्याचे पाटील म्हणाले. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे, असा टाेलाही त्यांनी लगावला. सध्या दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदाेलन हे आणखी तीव्र झाले असून, त्या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठीच शनिवारी केलेला चक्का जाम यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नसल्याचा आराेपही त्यांनी केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाबाबत बदललेल्या परिस्थितीत तिन्ही पक्ष चर्चा करून निर्णय घेतील, असं म्हणत पाटील यांनी अध्यक्षपदाबाबतचे गुढ आणखी वाढवले. यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, आमदार अमाेल मिटकरी, आमदार नितीन देशमुख आदी उपस्थित हाेेते.भाजप नेत्यांनी शहाणपणा शिकवू नये!इंधन दरवाढीवर केंद्राने कर कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं, अशावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचं शहाणपण शिकवू नये, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. केंद्राने एक रूपया जरी कमी केला तर करात माेठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सुनावले.‘फडणवीसांचे विधान गांभीर्याने घेत नाही’विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्य सरकारमध्ये विनाशिडीचे फासे पलटवू, असे विधान केले हाेते. या संदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता, फडणवीस यांना एक व्यक्ती म्हणून मी गांभीर्याने घेताे मात्र त्यांचे विधान गांभीर्याने घेत नाही, असा टाेला लगावला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेJayant Patilजयंत पाटील