शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काही जमत नाही; अजित पवारांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:09 IST

कोणीही सांगावं शरद पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. त्यांनी आजपर्यंत प्रत्येक बाबतीत सर्वधर्म समभाव हीच भूमिका स्वीकारली : अजित पवार

शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले लग्न कोणाबरोबर समजेचना असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला होता. तसंच त्यांनी नक्कलही करून दाखवली होती. यावर आता अजित पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काहीच जमत नाही. त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं. एकेकाळी आपले निवडून आलेले १४ आमदार आपल्याला सोडून का गेले? नुसती भाषणं करून जनतेचा आणि रोजीरोटीचा प्रश्नही सुटत नाही. ते खुप पलटी मारतात. आताच्या केंद्रातील सरकार विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका आपण पाहिली," असंही अजित पवार म्हणाले.

"सर्वधर्मसमभाव ही भूमिका स्वीकारली""शरद पवार त्यांच्या परीनं साबत आहेत, दिवस रात्र काम करत आहेत. लोकांना मार्गदर्शन करतायत, चांगला विचार मांडतायत तरी त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं असं म्हणतात. कोणीही सांगावं त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. त्यांनी आजपर्यंत प्रत्येक बाबतीत सर्वधर्म समभाव हीच भूमिका स्वीकारली," असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. ज्यावेळी १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार