शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काही जमत नाही; अजित पवारांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:09 IST

कोणीही सांगावं शरद पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. त्यांनी आजपर्यंत प्रत्येक बाबतीत सर्वधर्म समभाव हीच भूमिका स्वीकारली : अजित पवार

शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले लग्न कोणाबरोबर समजेचना असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला होता. तसंच त्यांनी नक्कलही करून दाखवली होती. यावर आता अजित पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काहीच जमत नाही. त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं. एकेकाळी आपले निवडून आलेले १४ आमदार आपल्याला सोडून का गेले? नुसती भाषणं करून जनतेचा आणि रोजीरोटीचा प्रश्नही सुटत नाही. ते खुप पलटी मारतात. आताच्या केंद्रातील सरकार विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका आपण पाहिली," असंही अजित पवार म्हणाले.

"सर्वधर्मसमभाव ही भूमिका स्वीकारली""शरद पवार त्यांच्या परीनं साबत आहेत, दिवस रात्र काम करत आहेत. लोकांना मार्गदर्शन करतायत, चांगला विचार मांडतायत तरी त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं असं म्हणतात. कोणीही सांगावं त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. त्यांनी आजपर्यंत प्रत्येक बाबतीत सर्वधर्म समभाव हीच भूमिका स्वीकारली," असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. ज्यावेळी १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार