शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 20:57 IST

'गंगा साफ करण्याची घोषणा करणारे पहिले व्यक्ती राजीव गांधी, आता नरेंद्र मोदी आले...'

Raj Thackeray Gudhi Padwa Melava : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातून त्यांनी महाकुंभ मेळावा आणि देशातील नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. 'बाळा नांदगावकरांनी माझ्यासाटी पाणी आणले होते, मी त्यांना सांगितले, मी पिणार नाही. मग नव्याने वारे शिरलेल्या काहींना वाटले की, मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? आज आपल्या देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. ज्या नद्यांना आपण माता म्हणतो, देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचे अजिबात लक्ष नाही.'

गंगेचा प्रश्न राजीव गांधींनी पहिल्यांदा मांडलाराज ठाकरे पुढे म्हणतात, 'गंगा साफ करावी असे पहिल्यांदा बोलणारी व्यक्ती राजीव गांधी होती. ते पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा गंगा साफ करण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत हेच काम सुरू आहे. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले, तेही म्हणाले गंगा साफ करणार. आताही ते काम सुरू आहे. माझ्याकडे काही उत्तरेतील लोक येऊन गेले. त्यांनी सांगितले लाखो लोकांनी कुंभमेळ्यात आंघोळ केल्यानंतर आजारी पडले. पडणारच ना आजारी. त्या गंगेवरची परिस्थिती काय आहे...प्रश्न गंगेचा आणि कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाही, प्रश्न पाण्याचा आहे. आतापर्यंत 33 हजार कोटी गंगेवर खर्च झालेत.'

गंगा प्रदूषणाचा व्हिडिओ दाखवला'एका महंताला मृत्यूनंतर तसेच गंगेत टाकले. घाटावर प्रेत जाळली जातात. अग्नि दिल्यासारखा करतात आणि प्रेत गंगेत टाकून देतात. हा कोणता धर्म? आपल्या देशातील निसर्गावर धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे? आपल्या गोष्टींवर आपण सुधारणा नको का करायला? काळ बदलला, लोकसंख्या वाढली. हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची वेगळी आहे. याच विधीसाठी वेगळी जागा करता येत नाही का? ते सांगतात लोक ऐकत नाही, ऐकत कसे नाहीत? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजे. या नद्यांचे काही भाग इतके गलिच्छ आहेत, या नद्या आपणच धर्माच्या नावाखाली बरबाद करतो आहोत.' यावेळी राज ठाकरेंनी गंगा प्रदूषणाचा एक मिनिटांचा व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओत गंगेवर प्रेत जाळताना दिसत आहे. 

धर्माच्या गोष्टी मला सांगू नये'महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थिती हीच आहे. देशभरातील 319 नदीपट्टे आणि महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. यातील सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या उल्हास, पवना, तापी, निरा वैनगंगा, रंगवली, वर्धा कृष्णा, मिठी नदी, पाताळगंगा...या नद्यांमधील पात्र खूप खराब आहे. मुंबईत पाच नद्या होत्या, त्यातल्या चार मेल्या, म्हणजे मारल्या. सांडपाणी आणि झोपडपट्ट्यांमुळे नदी मारली. पाचवीही मिठी नदी मरायला आली.' मुंबईतील नद्यांची परिस्थितीही दाखवली. जे-जे नैसर्गित स्त्रोत आहेत, ते त्यांनी बंद करायचे आणि आम्ही त्यावर बोललो तर धर्म आडवा येणार. धर्माच्या गोष्टी मला ह्यांनी सांगूच नये,' असेही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबई