शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय...विमानतळ रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
4
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
5
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
6
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
7
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
8
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
9
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
10
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
11
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
12
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
13
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
14
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
15
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
16
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
18
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
19
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
20
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार

राज्य शासनाच्या राज कपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा

By admin | Published: April 19, 2017 4:05 PM

यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो व चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले यांना घोषित करण्यात आला आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 -  राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो व राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांना तसेच चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले आणि व्ही.शांतारामविशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांना आज घोषित करण्यात आला आहे.
 
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनायच्या वतीने दरवरर्षी देण्यात येणा-या या पुरस्काराची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 
 
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह इतके आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने या पुरस्कारार्थींची २०१७ च्यापुरस्कारांसाठी निवड केली.
चेहऱ्यावरील हावभाव, डोळयातून व्यक्त होणाऱ्या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे कलाकार म्हणजे विक्रम गोखले. सशक्त, गंभीर भूमिका साकारणारेसंवेदनशील कलावंत म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला आहे.  विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. त्यांच्या रक्तातच अभिनय भिनलेला आहे. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि सिनेमातील एक गाजलेले नांव. गेली शंभर वर्षे जुनी परंपरा असणाऱ्या गोखले कुटुंबीयांचे विक्रम गोखले हे महत्त्वाचे शिलेदार आहेत. 
मात्र स्वकर्तृत्वावर ठाम विश्वास असणाऱ्या विक्रम गोखले यांनी स्वत:च्या अभिनय क्षमतेच्या जोरावर अभिनय क्षेत्रात नवी उंची गाठली आहे. मराठी हिंदी सोबतच त्यांनी गुजराती भाषेतही काम करत आपल्यातील कलावंताला त्यांनी अधिक प्रगल्भ केले आहे. अभिनय क्षेत्राची तब्बल ५० वर्ष अविरत सेवा करत त्यांनी समाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला आहे. मिशन-११, समर २००७, हे राम, मुक्ता, हम दिल दे चुके सनम, बलवान, अग्निपथ, परवाना यासह ९० चित्रपटांच्या वर हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.
 
अरुण नलावडे हे मराठी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन मालिका या तीनही माध्यमातून अतिशय सकसपणे भूमिका साकारणारे अष्टपैलू अभिनेते आहेत.  नलावडे यांचा प्रवास बेस्टच्या आंतरविभागीय एकांकिका स्पर्धा, विविध लोकप्रिय एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा असा सुरु झाला आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर नलावडे यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवत आपल्या कलेचा ठसा थेट ऑस्करच्या नामांकनापर्यंत पोहोचवला. २००३ मध्ये त्यांचा श्वास (२००३) या चित्रपटाने मराठी चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळवून दिले. वारसा, ताटवा या चित्रपटांचे दिग्दर्शन करताना त्यांनी सामाजिक विषयाला चित्रपट माध्यमातून मांडण्यास विशेष महत्व दिले आहे.
 
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात ज्या अभिनेत्रीने आपल्या अदाकारीने एक वेगळीओळख निर्माण करुन दिली त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो. सायरा बानो यांनी वयाच्या १७ व्या वर्षी हिंदी चित्रपट क्षेत्रातपदार्पण केले.  १९६१ साली त्यांनी प्रथमचशम्मी कपूर यांच्या सोबत जंगली या चित्रपटातून कारकीर्दीला प्रारंभ केला.  या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटासाठी सायरा बानो यांना फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनंतर त्यांनी अभिनय केलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. १९६०  ते १९७० च्या दशकात त्यांनी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांची कारर्कीर्दरसिकांच्या विशेष स्मरणात राहिली.
 
मुंबईतील तीन बत्ती सारख्या वस्तीमध्ये लहानपण घालविलेले बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा प्रवासही संघर्षाचा ठरला. आपल्या अभिनयाने रसिकांची नेहमीच दाद मिळविणारे जॅकी श्रॉफ यांचे महाविदयालयीन शिक्षण विल्सनमहाविद्यालयात झाले. महाविदयालयात असतानाच जॅकी श्रॉफ यांनी मॉडेलींगला सुरवात केली.  देवानंद दिग्दर्शीत स्वामी दादा (१९८२) या चित्रपटात खलनायक म्हणून अभिनय कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यानंतरसुभाष घई निर्मित हिरो (१९८३) ला चित्रपटाच्या यशाने जॅकी श्रॉफ ख-या अर्थाने स्टार झाले.  जॅकी श्रॉफ यांच्या वाटचालीतील तेरी मेहरबानीया, अंदर-बाहर, रिर्टन ऑफ ज्वेलथिफ, काश, राम लखन, कर्मा इत्यादी महत्वाच्या चित्रपटातून त्यांनी विविधरंगी महत्वाच्या भूमिका साकारल्या. चित्रपटाच्या सेटवर कर्मचारी वर्गाशी देखील मिळून मिसळून वागणे हे जॅकी श्रॉफ च्या स्वभावाचे खास वैशिष्टये आहे. ह्दयनाथ या मराठी चित्रपटातही त्यानी भूमिका साकारलेली आहे.
 
राज्य शासनाच्या वतीने यंदा ५४ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे वांद्रे रिक्लेमेशन, म्हाडा मैदान क्र. १, वांद्रे पश्चिम येथे आयोजन करण्यात आले आहे.  या पारितोषिक वितरण सोहळयात या जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.